व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

संगणक अभियंत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाकीपणाला कंटाळलेल्या संगणक अभियंत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा नुकताच प्रयत्न केला.
सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे तो बचावला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महंतेश शरणबसप्पा खैराटे (वय २७, रा. वृंदावन सोसायटी, मंत्री पार्कजवळ, कोथरूड) असे अभियंत्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या बावधनमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहे. दीपावलीत पाडव्याच्या दिवशी (ता. २९ ऑक्‍टोबर) त्याने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गणेशवाडीमध्ये शिवानंद अपार्टमेंटच्या आवारात विषारी औषध प्राशन केले होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैराटे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवानंद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. तिला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यावर काही मिनिटांतच तो जिन्यातून खाली आला. त्याने विषारी औषध प्राशन केले. तो तेथेच चक्कर येऊन पडला होता. मैत्रिणीने त्याला अन्य नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. झडतीमध्ये त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठी सापडली. त्यात "माझ्या एकाकीपणाच्या परिस्थितीला मीच कारणीभूत असून त्यामुळे आत्महत्या करीत आहे,' अशा आशयाचा मजकूर होता.

एकाकीपण, नैराश्‍य, अस्वस्थता, कामाचा ताण या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरुणांचं प्रमाण सध्या झपाट्यानं वाढतंय. गलेलठ्ठ पगार, उंची आयुष्य जगणाऱ्या तरुणांचंच प्रमाण यात अधिक आहे. सर्व सुखवस्तू उपभोगत असताना या तरुणांना कोणती चिंता ग्रासत असेल, की या आत्महत्येपुढे त्यांना या सर्व गोष्टी क्षुद्र वाटाव्या. आपल्याकडे आहे याचं उत्तर?

2 comments:

  1. Anonymous said...
     

    The life is not all about the high salary and high standerd of life. IT people get high salary but they also have to work hard. I know many people who work day and night. They even dont get time to talk to family members. What is the use of earning money if you are unable to enjoy it. Human being is a social animal and IT people are unable to socialise because of work load.
    Money cant buy happiness, High salary dosent mean happiness. You need to spend time with family and friends.

  2. Unknown said...
     

    Many of the IT workers goes away from home to work. They did not get family life. not get marriage to get their own space. so they become lonly n feel alone. Their expectation goes high about marriage so do not get marry in proper age so no love no family. After earning lot of money no family. So It professionals don`t run after money. Make ur expectations less, try to get marry in proper age and live happily.

Post a Comment