tag:blogger.com,1999:blog-47625695133980622172024-03-14T00:40:56.188+05:30पुणे प्रतिबिंबsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger313125tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-51763671873453982342009-01-08T12:57:00.001+05:302009-01-08T13:00:13.745+05:30सत्यम चा फुगा फुटलादेशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.<br /><span class=""></span><br />वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्यता आहे.<br /><br /> नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्वासार्हताही धोक्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.<br /><span class=""></span><br />हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.<br /><span class=""></span><br /><strong>दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...</strong>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-74223816659509524562008-12-13T15:47:00.000+05:302008-12-13T16:02:27.971+05:30जागतिक मंदीची झळ भारताला जाणवणार नाही""भारतातील आर्थिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील विविध निर्बंधांमुळे या जागतिक मंदीची झळ भारताला विशेष जाणवणार नाही; पण यातून आर्थिक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचा धडा आपण घ्यायला पाहिजे,'' <br /><br />""नफ्याचा अतिरेकी हव्यास, नियमांचे उल्लंघन यामुळे हे संकट उद्भवले. भावी पिढी यापासून योग्य धडा घेईल, अशी अपेक्षा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत "शैक्षणिक विकास' महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी सक्षम बनेल आणि भावी आर्थिक संकटापासून देशाला वाचवू शकेल.'' <br /><br />या मंदीचा परिणाम आपल्यालाही जाणवत असेल. या परिस्थितीत आपण कशाप्रकारे वागले पाहिजे. आपल्या सूचना आणि मते आम्हाला कळवा...Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-34230718331071792442008-12-12T15:43:00.000+05:302008-12-12T15:46:05.821+05:30कसाबचा जबाब२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्याला पकडणं शक्य झालं. मोहम्मद अजमल कसाब हा तो अतिरेकी. त्यानं गुरुवारी पोलिसांना कबुलीजबाब दिला. आपण तो ई- सकाळवर वाचलाच असेल. हा सर्व कबुलीजबाब वाचल्यानंतर तुमच्या मनात स्पंदनं उत्पन्न झाले असतील. भावनांचा कल्लोळ निर्माण झाला असेल. एवढ्या कबुलीजबाबनंतर पोलिसांनी आणि भारताने कोणतही कारवाई करावी, असे वाटते? पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर नक्की लिहा...Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-43052927929871084562008-12-11T12:47:00.000+05:302008-12-11T15:24:32.357+05:30राणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भमाजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारल्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असले, तरीही पुणे शहराचे राजकारण मात्र त्यामुळे ढवळून निघाले आहे. <br /><br /><br />राणेसमर्थक विनायक निम्हण त्यांच्याबरोबरच कॉंग्रेसबाहेर पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा जोर धरला आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम शहराच्या चार विधानसभा मतदारसंघांवर थेट होणार आहे. <br /><br />शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले विनायक निम्हण यांचा लौकिक राणे यांचे कट्टर समर्थक असाच आहे. निम्हण अजूनही तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले, तरीही ते मनाने राणे यांच्याबरोबरच कॉंग्रेसवासीय झाले होते. <br /><br /><br />राणे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समीकरणे बदलणार आहेत. निम्हण हे आता कॉंग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसणार, हे जवळजवळ निश्चित झाल्याने अनेकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ मूळचा आपलाच असल्याचा दावा चंद्रकांत छाजेड करू शकतील, किंवा गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले हे देखील आपला दावा सांगू शकतील. शिवाजीनगर राष्ट्रवादीकडे आल्यास कोथरूड कॉंग्रेसकडे जाणार. त्यामुळे कॉंग्रेसच्या दीपक मानकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कॉंग्रेसमधील इतर इच्छुकही कामास लागले आहेत. <br /><br />साहजिकच पुण्यातील आठही मतदारसंघांची स्थिती ही एखाद्या "तुकडे जोडून चित्र पूर्ण करा' या कोड्याप्रमाणे झाली असून, शिवाजीनगरमध्ये निम्हण घेणार असलेली भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.<br /><br />कॉंग्रेसमधून निलंबित केलेले नारायण राणे गुरुवारी कणकवली येथे येऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.<br /><br />तुम्हाला काय वाटते? राणे यांची घोषणा काय असेल? अन् तुम्हाला काय वाटते, त्यांची वाटचाल कशी असावी?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-74603004479326374062008-12-09T15:16:00.000+05:302008-12-09T15:32:16.480+05:30कॉंग्रेसमध्ये फक्त पैशाचा खेळ - राणे""कॉंग्रेस पक्षात सारा खेळ होतो तो फक्त पैशाचा. निष्ठावान आणि कर्तृत्ववान असणाऱ्यांना कधीच पद मिळत नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.<br />"पुढील राजकीय वाटचालीबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेणार असून आपल्यापुढे अनेक पर्याय खुले आहेत,'' असे त्यांनी सांगितले. <br /><br />पुण्यातील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यावर "विलासराव देशमुख यांच्या "पे-रोल'वरील विरोधी पक्षनेते,' अशा शब्दांत टीका केली. तसेच "हत्तीवर (बहुजन समाज पक्षात) बसणार काय,' या प्रश्नावर "अजून कोठे बसायचे हे ठरविलेले नाही,' असे सांगत त्या पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ऐकीव माहितीवर बातम्या करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. <br /><br />माझ्याप्रमाणे अनेकांचा कॉंग्रेसमध्ये विश्वासघात झाला आहे. पतंगराव कदम हे, त्यांना मंत्री व्हायचे नाही, असे सांगतात. पण, मंत्रिपद वाटपाच्या वेळी पहिल्या रांगेत उभे राहतात. विलासराव देशमुख त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकदाही पुण्यातील कॉंग्रेस भवनात गेले नाहीत. मात्र, पुण्यात आल्यावर ज्या भागामध्ये उद्योजक आहेत, त्या ठिकाणी वारंवार भेट देण्यासाठी जात, अशी टीकाही राणे यांनी केली. <br /><br />विरोधी पक्षनेता म्हणून रामदास कदम हे त्या पदाला कलंक आहेत. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यावरही त्यांनी सरकारविषयी काहीच विरोध व्यक्त केला नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना राजकीय व्यक्तींनी मदत केली आहे. मात्र, कोणत्या एका नेत्याने केली याची आपल्याला माहिती नाही, अशी भूमिका त्यांनी सोमवारी घेतली. <br /><br />सुरवातीला मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने कॉंग्रेसमध्ये आलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यता आले. त्यामुळे संपप्त झालेले राणे कॉंग्रेसवर घणाघाती टिका करू लागले आहेत. सर्व तारतम्य सोडून ही टीका केली जात आहे, जी केवळ अशोभनीय आहे. अशाप्रकारची टीका करताना किमान दहा वेळी केला गेला पाहिजे. आपल्याला काय वाटते? लिहा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवरVaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-72488356113002596572008-12-07T13:45:00.000+05:302008-12-07T13:49:35.547+05:30सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे दाखवायला देखील पुरेशी आहे. <br /><br />ज्यावेळी महाराष्ट्राला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती, त्याच काळात स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्याचा, शह-काटशहाचे राजकारण करण्यात प्रत्येकजण गुंतला होता. नेतृत्व निवडीवरून जो काही गोंधळ कॉंग्रेस पक्षाने मांडला होता, त्याला तोड नव्हती. २६ तास चर्चेचे गुऱ्हाळ मांडूनही आपण राज्याला नेतृत्व देऊ शकत नाही, यातच कॉंग्रेसचे या प्रश्नाप्रती नसलेले गांभीर्य लक्षात येते. या प्रश्नाचे परीक्षण कॉंग्रेसने लोकांसाठी नाही, तर निदान स्वतःसाठी (आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून) केले असते, खूप झाले असते. <br /><br />आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या आधी (मग ते काही तास का असेना) उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून राष्ट्रवादीने थोडातरी सूज्ञपणा दाखवला. <br /><br />एवढ्या गोंधळानंतर तरी सर्व आलबेल होणे लोकांना अपेक्षित असले तरी "सत्ताकारणात' असे होतच नाही. म्हणूनच अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होताच नारायण राणे यांनी पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर टीकेची तोफ डागून पक्षामधील लोकशाहीची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली. <br /><br />खरं तर ही वेळ कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कुरवाळत बसण्याची नव्हती. राज्यात कोणत्या परिस्थितीत नेतृत्व बदल केला जात आहे, याची जाणीव राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवी होती. मात्र कोणत्याही कारणाने होत असलेला नेतृत्वबदल हा प्रत्येकालाच सत्तेची पोळी भाजायला सोयीचा वाटला. आणि सर्वचजण खुर्चीसाठी पुढे सरसावले होते. मग राणेंनी तरी विवेक का बाळगावा? <br /><br />वास्तविक अतिशय नामुष्कीजनकरीत्या आघाडी सरकारला नेतृत्वबदल करायला लागला होता. अशावेळी किमान सर्वांनी नवीन नेत्याला पाठिंबा देत लोकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करत दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या मुंबईला सावरणे आवश्यक होते. त्याचबरोबर सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देणे, भविष्यकाळात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा होता. पण, लोकांना पहायला मिळाली ती नेत्यांची संकुचित मनोवृत्ती आणि सत्तालालसा. त्यामुळे रुढार्थाने जरी आता महाराष्ट्राला नेतृत्व मिळाले असले,तरी महाराष्ट्रातली "निर्नायकी' संपली असे अजून तरी म्हणता येणार नाही. आणि हा निर्नायकी महाराष्ट्र सतत धुमसत राहील, हे सांगायला वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही. <br /><br />आपल्याला काय वाटते? नक्की लिहा...Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-10043444253838690802008-12-05T13:11:00.000+05:302008-12-05T13:15:16.388+05:30अतिरेक्यांशी लढण्यासाठी हवे "फायटिंग कॅप्सूल'पुण्यातील संशोधकाची कल्पना <br /><br />संख्येने केवळ १० असलेल्या अतिरेक्यांनी देशाला ५९ तास वेठीस धरले... शूर अधिकाऱ्यांसह २०० जणांचा बळी घेतला... ४०० वर कमांडो आणि हजारो पोलिसांना तीन दिवस झुंज द्यावी लागली. अतिरेक्यांविरुद्धचे युद्ध भारत जिंकला असला, तरी अतिरेक्यांनीही त्यांचा कट जवळपास पूर्ण केला आहे, हे विसरता येणार नाही. अतिरेक्यांच्या हल्ल्याची ही अभूतपूर्व घटना पाहून व्यथित झालेल्या पुण्यातील संशोधकाने या प्रकारच्या हल्ल्यातील मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी "फायटिंग कॅप्सूल' निर्मितीची कल्पना मांडली आहे.<br /><br />मिलिंद कुलकर्णी यांनी अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठीचे "फायटिंग कॅप्सूल' तयार करण्याचे आवाहन सरकार आणि खासगी उद्योजकांना केले आहे. जवानांचे आणि नागरिकांचे प्राण न गमावता अतिरेक्यांना ठार मारणे, कारवाई कमी वेळात पूर्ण करणे, अंधारात अतिरेक्यांना शोधणे, आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करणे या "कॅप्सूल'मुळे शक्य होईल, असा विश्वास श्री. कुलकर्णी व्यक्त करतात.<br /><br />अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा जवानांची नेहमीच अशी कोंडी होते. ही कोंडी या प्रकारच्या "कॅप्सूल'ने सुटेल, अशी आशा निश्चितपणे निर्माण होऊ शकते.<br /><br />श्री. कुलकर्णी यांनी या "फायटिंग कॅप्सूल'विषयी अशी माहिती दिली. १) सर्व दारांमधून त्याला जाता यावे आणि मशीनगन चालविता यावी, म्हणून ते ३२ इंच व्यासाचे असावे. २) त्याची उंची ६ फूट असावी. ३) आग, बॉंबहल्ला, गोळीबाराचा परिणाम होऊ नये म्हणून ते अर्धा इंच जाडीच्या मिश्रधातूने बनविण्यात यावे. ४) त्यात एका जवानास बसण्याची आणि मशीनगन, बॉंब ठेवण्याची सोय असावी. ५) त्याच्या डोक्यावर जाड काचेचे प्रखर दिवे असावेत. ६) त्याला वीजपुरवठा मजबूत अशा केबलद्वारे जनरेटर व्हॅनमधून करण्यात यावा. ७) व्हॅनमध्ये केबलची रीळ (बॉबीन) जरुरीप्रमाणे सोडण्याची सोय असावी. ८) "कॅप्सूल' कोणत्याही क्षणी ३६० अंशातून फिरू शकेल आणि हल्ला करू शकेल. ९) आतील जवान आणि कारवाईतील इतर <br /><br />"फायटिंग कॅप्सूल'सारख्या साधनांची निर्मिती करून अतिरेक्यांच्या मनात धडकी बसविण्याची गरज आहे. हे "कॅप्सूल' अगदी याचप्रमाणे निर्माण करता येईल, असा श्री. कुलकर्णी यांचा दावा नाही; मात्र, अशा पर्यायांवर विचार सुरू व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे.<br /><br />"फायटिंग कॅप्सूल'ची ही कल्पना आपल्याला कशी वाटते? अतिरेक्यांशी लढण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्या साधन, शस्त्रांची निर्मिती करावी, असे आपल्याला वाटते? आपल्या कल्पना आम्हाला नक्की कळवा..Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com18tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-37363248613065356102008-12-03T13:09:00.000+05:302008-12-03T13:42:20.842+05:30नेतृत्वबदलातील अडचणी* उत्तराधिकारी म्हणून कॉंग्रेसकडे मर्यादित पर्याय <br />* आताच्या परिस्थितीत पद स्वीकारण्यास प्रमुख नेते उत्साही नाहीत.<br />* मुंबईवरील हल्ल, लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर लगेचच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक, अशी चढत्या क्रमातील आव्हाने पेलण्याची नेतृत्वाची तयारी नाही.<br />* त्याउलट, देशमुख यांनाच कायम ठेवा आणि संभाव्य अपयशाचेही धनी त्यांनाच होऊ द्या.<br /><br />या भावना आहेत कॉंग्रेसमधील नेत्यांच्या. देशातील सत्ताधारी आणि मोठ पक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षातील ही स्थिती नक्कीच कीव आणणारी आहे. जर कॉंग्रेसकडे पर्याय नसेल, तर का राष्ट्रपती राजवट लागू करू नये? तुम्हाला वाटते का, की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-55572885299606693192008-12-01T14:49:00.000+05:302008-12-01T14:53:13.079+05:30हे तर राजकीय युद्धदोन दिवसांपूर्वीच मुंबईवर आलेलं दहशतरुपी संकट हाताळताना आलेल्या अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. <br /><br />तर राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाहीर केले. दबावाखाली येऊन त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांनी निर्णयच घेतला असेल, तर राजकीय शिष्टाचार पाळण्याची गरज आहे का? या एकूण राजीनामानाट्यावरून श्री. देशमुख यांचा सत्तेचा हव्यास अजून सुटत नाहीये, असेच लक्षात येते आहे. <br />लोकशाही राष्ट्रातील नागरिक म्हणून तुम्हाला आपली मते व्यक्त करावीशी वाटत असतील.<br /> <br />मुंबईतील प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असे तुम्हाला वाटते का? <br /><br />अन् मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत कोणाला पहाता? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण की नारायण राणेंना? <br /><br />तर, बडे बडे शहरोंमें एसी छोटी छोटी बातें होती रहती हैं....! असा फिल्मी डायलॉग मारणाऱ्या आबांना एवढी मोठी घटना किरकोळ वाटावी? त्या पार्श्वभूमीवर आबांचा राजीनामा तर अटळच होता. ज्याच्या हातात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्या व्यक्तीला असे बोलणे शोभते का?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-11216505384466778422008-11-25T23:01:00.001+05:302008-11-25T23:15:20.624+05:30सुसंस्कृत समाजातही "अग्निपरीक्षे'चा विळखा<p>शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात चोरीच्या आरोपावरून चार महिलांना द्याव्या लागलेल्या "अग्निपरीक्षे'च्या घटनेमुळे आजच्या संगणक युगातील सुसंस्कृत समाजात अद्यापही अज्ञान आणि अंधःश्रद्धा आणि विकृती घर करून असल्याचा प्रत्यय आला.</p><p>मंगळसूत्र चोरले नाही हे सिद्ध करण्यासाठी विमाननगर येथील देवकर वस्तीत ता. २३ नोव्हेंबर रोजी चार महिलांना "अग्निपरीक्षा' द्यावी लागली आहे. या चौघींना कढईतील गरम तेलात हात घालण्यास भाग पाडणाऱ्या सासू-सुनेला विमानतळ पोलिसांनी अटक केली.</p><p>शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या पुण्यनगरीत अशी घृणास्पद घटना व्हावी, याशिवाय दुसरं दुर्देव ते कोणतं...!</p><p>आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते?.... </p>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-44323404062768565662008-11-25T14:05:00.000+05:302008-11-25T14:20:09.604+05:30मृतदेह अदलाबदलीच्या चौकशीसाठी समितीससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर मृतदेहांची अदलाबदल झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती ससून रुग्णालयाने सोमवारी नियुक्त केली. <br /><br />ससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर रविवारी संजय आबनावे व सुरेश वजीरसिंग घागडे यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देताना अदलाबदल झाली होती. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाने डॉ. अलका पवार, डॉ. एम. व्ही. जाधव, डॉ. दीपाली बिथारिया व कार्यालयीन अधीक्षक रमेश जगताप यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. झालेल्या घटनेच्या चौकशीचा अहवाल ही समिती सादर करणार आहे, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. <br /><br />दरम्यान, मरणोत्तर तपासणी विभागातील एका कर्मचाऱ्याची (टेक्निशियन) प्रशासनाने सोमवारी दुसऱ्या विभागात बदली केली. आबनावे यांचा मृतदेह समजून घागडे यांचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांकडेही या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. <br /><br />आधीच जवळचा व्यक्ती गेल्यानं व्याकूळ झालेल्या नातेवाईकांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागणं, हे केवळ निंदनीय आहे. असा ढिसाळ कारभार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाटते का? मग आम्हाला नक्की लिहा...Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-78368218091962107272008-11-18T13:04:00.000+05:302008-11-18T13:13:01.151+05:30"आयटी'तील भूमिपुत्रमाहिती तंत्रज्ञान हा देशाच्या विकासात भर घालणारा सेवा क्षेत्रातील आघाडीचा उद्योग. या उद्योगात निर्माण होणारा प्रत्येक रोजगार कुशल आणि अकुशल क्षेत्रात चार रोजगार संधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देतो. या क्षेत्राला केंद्र आणि राज्य सरकारकडून कराद्वारे मिळणाऱ्या सवलतीही मोठ्या आहेत. असे असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील उमेदवारांना नोकऱ्यांत संधी नाकारणे, हा कायदा धाब्यावर बसविण्याचाच प्रकार आहे. पुणे विभागातील नोंदणी केलेल्या कंपन्यांपैकी केवळ १०-१५ टक्केच कंपन्या जिल्हा रोजगार विनिमय केंद्रांकडे नोंदणी करतात. ही रोजगार विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. औद्योगिक विकासात स्थानिक लोकांना पुरेशी रोजगाराची संधी मिळाल्यास सामाजिक ताण निर्माण होत नाही. रोजगार मिळाल्याने महानगरांकडे होणाऱ्या स्थलांतरावरही नियंत्रण राहू शकते. महाराष्ट्र सरकारने याबाबत १३ फेब्रुवारी १९७३ मध्येच अध्यादेश जारी केलेला आहे. राज्याच्या निरनिराळ्या विभागांच्या तुलनात्मक शक्तिस्थानांचा उपयोग करून संतुलित विकास साधावा, या उद्देशाने हे धोरण राबविण्यात आले. <br /><br />२५ पेक्षा अधिक कर्मचारीसंख्या असलेल्या छोट्या आस्थापनांना हा नियम लागू असल्याने सरकारच्या रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना साथ देणे, ही आयटी क्षेत्रातील कंपन्यांचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून या उद्योगांना २०१० पर्यंत करसवलतीत मुदतवाढही जाहीर झालेली आहे. भारताचा या क्षेत्रातील पुढावा कायम राहण्यासाठी या सवलती आवश्यक आहेत. मात्र सवलतीत <br />ून कंपनीचा विकास साधताना समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे भान या कंपन्यांनी कायम ठेवायला हवे. बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगालसारख्या राज्यांत स्थानिकांना रोजगारप्रक्रियेत सामावून घेण्याच्या नियमांचे कसोशीने पालन केले जाते. तसे न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईही होते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात हे का होत नाही, याचे उत्तर प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने द्यायला हवे. <br /><br />आयटी कंपन्यांनीही प्रशिक्षण देऊन स्थानिकांची उपयुक्तता वाढेल, हे पाहायला हवे. महाराष्ट्रातील अविकसित जिल्ह्यांत स्थानिकांना रोजगाराचे धोरण राबविल्यास मंदी सुसह्य होणार आहे.<br /><br />कायदा असूनही आयटी कंपन्या जर कायद्याला जुमानत नसतील, तर अशा कंपन्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करायला हवा. आपल्याला काय वाटते? आम्हाला नक्की लिहा.Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-7388884996477690312008-11-14T17:11:00.000+05:302008-11-14T17:21:37.451+05:30पुण्यातील "बालपण' - पाचशे मुले रोज रस्त्यावरगोडगोजिऱ्या मुलांच्या सान्निध्यात बालदिन साजरा केला जात असताना पुण्यासारख्या शहरात रस्त्यावरच्या मुलांचा प्रश्न गांभीर्याने उभा ठाकला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. <br />आशाकिरण या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून, शहरात चार ते १५ वयोगटातील पाचशे मुले दररोज रस्त्यावर असतात, हे वास्तव समोर आले आहे. <br /><br />रस्त्यावर राहणाऱ्या चारशे मुलांच्या अभ्यासांतर्गत संस्थेने या मुलांचे प्रमाण, त्याचे स्वरूप, कारणे, वयोगट, लिंगभाव, स्थलांतर, शिक्षण, वर्तन, रोजचे उत्पन्न, व्यसने, सवयी, व्याधी आदी बाबींवर भर दिला आहे. त्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, महापालिका भवन, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, गुलटेकडी, डेक्कन, पर्वती, सारसबाग, भवानी पेठ अशा अकरा परिसरांतील मुलांची निवड केली. <br /><br />या सर्वेक्षणानुसार चार ते १५ या वयोगटातील ५०० मुले दररोज पुण्यात रस्त्यांवर आढळून येतात. त्यापैकी ७२ टक्के मुले, तर २८ टक्के मुली असतात. विविध शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या मुलांचे प्रमाणही मोठे असून, एकूण मुलांपैकी भीक मागणाऱ्या मुलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. रोज ५० ते तीनशे रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५० टक्के आहे; तर २५० रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वांत कमी शून्य पूर्णांक चार टक्के आहे. पैशांची बचत करणारी मुले केवळ २७ टक्के असून ५५ टक्के मुलांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. बचतीसाठी ते गल्ला, पुरचुंडी, दगड (खाली), कुटुंबीय इत्यादी पर्यायांचा वापर करतात. खाद्यपदार्थांवर खर्च करणाऱ्या मुलांचे प्रमाण ३० टक्के आहे. त्याव्यतिरिक्त खेळ, चित्रपट, व्यसने आदींवरही पैसे खर्च केले जातात. <br /><br />व्यसनासाठी विविध पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. त्यामध्ये व्हाइटनर, दारू, सिगारेट- बिडी, गुटखा, तंबाखू, मशेरीचा समावेश असून सर्वाधिक ४४ टक्के मुले "व्हाइटनर'चे व्यसन करतात. त्याखालोखाल दारूचे व्यसन करतात. <br /><br />शिक्षणाबाबत बहुतांश मुलांच्या ठायी उदासीनता आढळते. त्यामुळे ६२ टक्के मुले अशिक्षित, तर २९ टक्के अल्पशिक्षित आहेत. शिकण्याची इच्छा आहे का, असे विचारले तेव्हा ६३ टक्के मुलांनी राहण्याची व्यवस्था झाल्यासच शिक्षण घेण्यास होकार दिला. तर, २४ टक्के मुलांनी नकार दर्शविला. सहा टक्के मुलांनी मात्र मौन बाळगले. ८३ टक्के मुले आपल्या कुटुंबाबरोबर राहत असली, तरी सुमारे आठ टक्के मुले एकटीच आहेत. त्यातील बरीच मुले गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यावर असून विविध कारणांमुळे घरातून पळून येणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या १० ते १२ वयोगटातील मुलांचे प्रमाण मोठे (२० टक्के) आहे. <br /><br />याबाबत संस्थेचे संचालक मनीष श्रॉफ "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""रस्त्यांवरील मुलांसाठी काही प्रकल्प आखण्यासाठी असे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन टप्प्यांत हे सर्वेक्षण केले. त्यासाठी आमचे १५ प्रतिनिधी दीड महिना काम करत होते.'' <br /><br />मुलांच्या उत्पन्नाचे साधन (टक्केवारीत) <br />भीक मागणे - ५५ टक्के <br />गाडी साफ करणे, टपरीवर काम करणे, विक्री - १४ टक्के <br />फुले विक्री - एक टक्का <br />सॉफ्ट टॉईज - ८.५ टक्के <br />वृत्तपत्र विक्री - एक टक्का <br />कचरा गोळा करणे - ४.५ टक्के <br />चोरी - सात टक्के <br /><br />रोजचे उत्पन्न (टक्केवारीत) <br />शंभर रुपये - ५० <br />दीडशे रुपये - १४-१५ <br />दोनशे रुपये - १५ <br />अडीचशे - ०.४ <br />तीनशे - दोन <br />पन्नास रुपये - १७.३ <br /><br />पैसे बचत (टक्केवारीत) <br />पैसे बचत करणारी एकूण मुले - २७ <br />करत नाही - ५ <br />माहीत नाही - ५५ <br />गल्ला, कपड्याची पुरचुंडी बांधून - २७ <br />दगडाखाली - ०.८ <br />आईकडे - ९ <br />मौन बाळगले - १२.५ <br /><br />------------------------ <br />व्यसने <br /><br />व्हाइटनर - ४४ <br />दारू - २० <br />सिगारेट- बिडी - १० <br />गुटखा, तंबाखू, तत्सम - २१- २२<br /><br />ही आकडेवारी अतिशय बोलकी आहे. मात्र, तेवढीच मनाला चटका लावणारीही. आज एवढ्या मुलांचं भविष्य अंधकारमय होत आहे. त्यांचं बालपण कोमेजलं जातंय. अशा अवस्थेत आपण २०२० मध्ये महासत्ता बनण्याचं स्वप्न कसं पाहणार? <br /> <br /> - वैशाली भुतेVaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-22554690550944945942008-11-08T12:17:00.000+05:302008-11-08T12:26:26.939+05:30"आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार का?'राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे. <br /><br />हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे करनाल मध्ये राहत असलेल्या सुर्यवंशी कुटुंबियांना हा प्रकार अतिशय अनपेक्षित असाच होता. <br /><br />हा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचाच परिणाम असल्याने "आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार आहेत का', असा प्रश्न सुर्यवंशी यांच्या पत्नी कल्पना यांनी केला आहे. <br /><br />केवळ आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमच्यावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे, असे कल्पना सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही येथून कुठेही जाणार नाही कारण हा "आमचा देश' आहे. आणि देशात कोठेही राहण्याचा आणि काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे मतही कल्पना यांनी व्यक्त केले. <br /><br />करनालमध्ये सुमारे ५०० मराठी कुटुंबं आहेत. या घटनेचा धसका या सर्वांनीच घेतला आहे. <br /><br />केवळ करनाल किंवा हरियाणाच नाही तर झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील मराठी लोकांनाही आता आपल्यावरही असाच प्रसंग येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे. <br /><br />सूर्यवंशी कुटुंबीयांना मराठी असण्याचा झालेला तोटा इतर प्रांतात राहणाऱ्या आणखी किती कुटुंबीयांना बसणार हे आता तरी सांगता येणार नाही. पण, हे लोण असेच पसरत राहिले तर मराठीजनांना पळता भुई थोडी होईल, यात शंका नाही. एवढंच नाही, तर प्रांतीय वाद उफाळून येऊन सर्वच परप्रांतीय एकमेकांविरुद्ध बंड पुकारतील. अशा अवस्थेत राजकारण्यांची सामंज्यस्याची भूमिका घेणे, केव्हाही चांगले. आपल्याला काय वाटते?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-48371732247315455212008-11-06T17:38:00.000+05:302008-11-06T17:40:00.523+05:30ओबामा जिंकले कसे?अवघ्या दोन वर्षांपूर्वी बराक हुसेन ओबामा कोणाला माहिती होते?... फारसे कोणालाच नव्हते. अमेरिकेच्या राजकीय नकाशावर उदय होण्याइतपतही इलिनॉसच्या या सिनेटरचे राजकारणात स्थान नव्हते. <br /><br />मग ते जिंकले कसे? चतुर आणि शिस्तबद्ध प्रचार, पैशाचा प्रचंड वापर आणि अनुकूल राजकीय वातावरण हे तीन मुद्दे ओबामांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, असे जागतिक प्रसारमाध्यमांनी विश्लेषण केले आहे. <br /><br />उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ओबामांनी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या दिग्गजाला मागे टाकले, तेथेच ते अर्धी लढाई जिंकले. उरलेली लढाई त्यांनी पैशाच्या जोरावर जिंकली. प्राथमिक फेऱ्यांतच ओबामांना वाढता प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. दात्यांची संख्या जशी वाढत गेली, तसा त्यांनी प्रचारासाठी सरकारी पैसा नाकारला. त्यामुळे पैशाच्या वापराचे बंधनही त्यांच्यावर उरले नाही. त्यांच्या प्रचार मोहिमेला पैसा देणाऱ्यांची मोठी फळी उभी राहिली. "फेसबुक'चे संस्थापक ख्रिस ह्यूज यांनी ओबामांना इंटरनेट निधी प्रणाली तयार करून दिली. त्याद्वारा ३० लाख लोकांनी त्यांना पैसा उभा करून दिला. त्यातूनच ओबामा हे विरोधी जॉन मॅकगेन यांच्यापेक्षा चौपट खर्च करू शकले. <br /><br />दूरचित्रवाणीचा ओबामांनी आपल्या प्रचारात मॅकगेन यांच्यापेक्षा सफाईने वापर करून घेतला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओबामांनी मॅकगेन यांना प्रत्येक आघाडीवर मागे टाकले. रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ओबामांनी मॅकगेन यांची दमछाक केली. व्हिडिओ गेमच्या सीडींमध्येही ओबामांनी जाहिराती दिल्या. <br /><br />"व्होट फॉर चेंज' (बदलासाठी मतदान करा) हे ओबामांचे आवाहन अमेरिकेतील तरुणाईला भावले आणि त्यांनी ओबामांना भरभरून मतदान केले, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. "एक घर, एक कार आणि एक कुटुंब' या प्रतिमेमुळे ओबामांना ज्येष्ठांची पसंती मिळाली. <br /><br />आपल्याला काय वाटते, कशाच्या जोरावर ओबामा निवडणूक जिंकले असतील...चतुर आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे की अनुकुल वातावरणामुळे? आपण ओबामाच्या जिंकण्याने समाधानी आहात का? भारतीयांची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, असे वाटते? <br /><br /><a href=http://www.esakal.com/features/051108/obama_slide/index.htm>बराक ओबामा यांचा स्लाईड शो </a>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-17797782300378266312008-11-04T12:05:00.000+05:302008-11-04T12:17:59.593+05:30मोटारींच्या प्रकाशात उमेदवारांची धावण्याची चाचणीवेळापत्रक लांबल्यामुळे शहर पोलिस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोटारींच्या दिव्यांच्या प्रकाशात धावण्याची चाचणी पूर्ण करण्याची सोमवारी रात्री वेळ आली. <br />मोटारी, जीपच्या दिव्यांच्या उजेडात धावण्याची चाचणी होत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालय मैदानाबाहेर बघ्यांनी रात्री गर्दी केली होती. <br /><br /><br />पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीच्या मैदानावर दिव्यांची पुरेशी व्यवस्था नव्हती. तेथे उभारण्यात आलेल्या चार तंबूंबाहेर हॅलोजन दिवे लावण्यात आले होते; परंतु त्यांचा पुरेसा प्रकाश पडत नव्हता. त्यामुळे दहा-बारा पोलिस जीप व मोटारींचे मैदानावर कोंडाळे करण्यात आले. त्या सुरू ठेवून त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात उमेदवारांनी धावण्याची चाचणी पूर्ण केली. त्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून मोटारी व जीप मैदानावर तैनात करण्यात आल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता ही चाचणी पूर्ण झाल्यावर उमेदवार नोंदणी कक्षात पोचले. तेथे रात्री साडेनऊपर्यंत त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आयुक्तालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनाही मैदानावरून घरी निघण्यासाठी रात्रीचे दहा वाजले. <br /><br />याबाबत उपायुक्त अनंत रोकडे यांनी पहिला दिवस असल्याने ही वेळ आल्याचे सांगितले असले, तरी या सर्व गोष्टी गृहित धरून आवश्यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे हाते. त्याबाबत गलथान राहण्याचा काहीही संबंध नव्हता, असे वाटते.Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-27920073680675020262008-11-03T12:32:00.000+05:302008-11-03T12:42:26.186+05:30संगणक अभियंत्याचा आत्महत्येचा प्रयत्नएकाकीपणाला कंटाळलेल्या संगणक अभियंत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा नुकताच प्रयत्न केला. <br />सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे तो बचावला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. <br /><br />महंतेश शरणबसप्पा खैराटे (वय २७, रा. वृंदावन सोसायटी, मंत्री पार्कजवळ, कोथरूड) असे अभियंत्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या बावधनमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहे. दीपावलीत पाडव्याच्या दिवशी (ता. २९ ऑक्टोबर) त्याने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गणेशवाडीमध्ये शिवानंद अपार्टमेंटच्या आवारात विषारी औषध प्राशन केले होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. <br /><br />पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैराटे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवानंद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. तिला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यावर काही मिनिटांतच तो जिन्यातून खाली आला. त्याने विषारी औषध प्राशन केले. तो तेथेच चक्कर येऊन पडला होता. मैत्रिणीने त्याला अन्य नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. झडतीमध्ये त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठी सापडली. त्यात "माझ्या एकाकीपणाच्या परिस्थितीला मीच कारणीभूत असून त्यामुळे आत्महत्या करीत आहे,' अशा आशयाचा मजकूर होता. <br /><br />एकाकीपण, नैराश्य, अस्वस्थता, कामाचा ताण या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरुणांचं प्रमाण सध्या झपाट्यानं वाढतंय. गलेलठ्ठ पगार, उंची आयुष्य जगणाऱ्या तरुणांचंच प्रमाण यात अधिक आहे. सर्व सुखवस्तू उपभोगत असताना या तरुणांना कोणती चिंता ग्रासत असेल, की या आत्महत्येपुढे त्यांना या सर्व गोष्टी क्षुद्र वाटाव्या. आपल्याकडे आहे याचं उत्तर?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-16814206442101732732008-11-02T13:32:00.000+05:302008-11-02T13:39:35.214+05:30आत्महत्या थांबविण्यास "पॅकेज' हा उपाय नाहीपुणे, ता. १ - ""विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी "पॅकेज' हा उपाय नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढणारच आहे. त्याऐवजी शेतीची पायाभूत साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी शनिवारी व्यक्त केले.<br />समाजाला पर्यावरणरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, यासाठी "क्रिएशन एंटरटेनमेंट' आणि म्हैसकर फाउंडेशनतर्फे "सृष्टी' हा नृत्याविष्कार आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी राजेंद्रसिंह बोलत होते. <br /><br />ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना पैशाचे नियोजन करता आले नाही, अशांसाठी पॅकेज जाहीर करणे म्हणजे आत्महत्या वाढविण्याचा खेळ आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आत्महत्येचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर मार्ग काढणारी यंत्रणा सरकारने उभी करावी.'' <br /><br />या वेळी राजेंद्रसिंह यांनी पाण्याविषयी भारतामध्ये परंपरेतून आलेली आत्मीयता, राजस्थानमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून केलेला कायापालट, नदी प्रदूषण, सरकारची भूमिका, पाणी प्रश्नाशी निगडित विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. <br /><br />ते म्हणाले, ""भारतीय संस्कृतीत पाण्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच पूर्वजांनी विविध परंपरांच्या माध्यमातून पाण्याविषयी वाटणारी कृतज्ञताही जपली. मात्र, तंत्रज्ञान, विकासाच्या मागे धावणाऱ्या आपल्या पिढीला याची जाणीव नाही. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडला आहे. प्रदूषण, बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, भूजल शोषण यामुळे देशातील १४४ लहान-मोठ्या नद्यांवर संकट आले आहे. तरीही सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. समाजाने सरकारवर दबाव आणला तरच यावर मार्ग काढणे शक्य आहे,'' असेही त्यांनी सांगितले. <br /><br />घरातल्या पाण्यापासून ते समुद्रापर्यंत पाणी कोणतेही असू देत, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात "सृष्टी' हा नृत्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. कथक, लोकसंगीत व दृक्श्राव्य माध्यमातून पर्यावरणरक्षणाचा संदेश या वेळी त्यांनी दिला. प्रसिद्ध नृत्यांगना रोशन दात्ये यांनी या बॅलेचे दिग्दर्शन केले होते. अनघा घैसास यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.<br /><br />श्री. राजेंद्रसिंह यांनी केलेले प्रतिपादन योग्यच आहे. शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. केवळ पॅकेज वाढवून हा प्रश्न सोडविता येणार नाही. तर, प्रश्नाचे मूळ शोधला पाहिजे. आपल्याला आणखी काही उपाय सांगावेसे वाटतात का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याप्रकाची पावले उचलली गेली पाहिजेत?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-14901189841131320752008-11-01T16:44:00.000+05:302008-11-01T16:46:21.436+05:30रामविलास पासवान यांचा सल्ला योग्य म्हणावा का?एकीकडे राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सर्व नेते मंडळी, शासन आणि पोलिसांवर टीका करत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र बिहार आणि उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. रामविलास पासवान यांनी राज यांच्याविरुद्धच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी भावना भडकविणारे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या आधारे त्यांच्याविरुद्ध कारवाई, राहुल राज मृत्यूप्रकारणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी आणि न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून ठाकरे यांना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देणे, या मागण्या कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. <br /><br />काही उत्तर भारतीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या विरोधातही भूमिका घेतली. तर,राज यांच्यावरकरावाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य ढिलाई दाखविली आहे, अशा शब्दात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला. <br /><br />उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात दंड थोपटले असले, तरी अद्यापही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. राज्यातील नेते संघटित झाल्यास उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्यावर वचक बसेल. आपल्याला काय वाटते?Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-91619436964300623282008-10-31T14:29:00.001+05:302008-10-31T14:31:14.890+05:30पुन्हा एकदा "राज'कीय वादळ?राहुल राज या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची विशेष परवानगी घेऊन वांद्रयात पत्रकार परिषद घेऊन शासन, पोलिस आणि राजकीय नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. सरकार बदलत असतात. आज तुमची वेळ आहे. उद्या माझी येईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांना दिला. संवेदनशील परिस्थितीत नेत्यांनी सुरक्षा वाढविली जात असताना, माझी मात्र सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा खडा सवालही त्यांनी या वेळी विचारला. त्याचबरोबर त्यांनी छट पूजा, लालू प्रसाद यादव यांबाबत बिनधास्त मतं नोंदविली.<br /><span class=""></span><br />भाषणावर बंदी असताना राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेला परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर राज यांनी, टाळ्या काय वाजवताय, ही पत्रकार परिषद आहे, जाहीर सभा नाही, अशी कानउघाडणी केली.<br /><div align="center"><br /><strong>राज यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्द्याला हात घातला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज यांना पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देणे योग्य आहे का? या परिषदेमुळे वातावरण पुन्हा गढूळ होण्याची शक्यता पोलिसांना वाटली नाही का? </strong></div>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-58214926146662403212008-10-26T13:14:00.004+05:302008-10-26T13:25:19.691+05:30प्रकाशाची फुले...<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgZh_hMXI/AAAAAAAAARE/CxvZGzyYVDE/s1600-h/Wadekar_Blog_01.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 170px;" src="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgZh_hMXI/AAAAAAAAARE/CxvZGzyYVDE/s200/Wadekar_Blog_01.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365887669186930" /></a><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://1.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgUqUo97I/AAAAAAAAAQ8/AW4OwKNfsog/s1600-h/Wadekar_Blog_02.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 133px;" src="http://1.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgUqUo97I/AAAAAAAAAQ8/AW4OwKNfsog/s200/Wadekar_Blog_02.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365804005914546" /></a><br /><br /><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 116px;" src="http://2.bp.blogspot.com/_QLcp5QoQ6Aw/SQQgM_NsTVI/AAAAAAAAAQ0/ecEj1bG8pqo/s200/Wadekar_Blog_03.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5261365672174964050" /><span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 0, 0); -webkit-border-horizontal-spacing: 2px; -webkit-border-vertical-spacing: 2px; font-family:usubak;font-size:19px;"><div style="text-align: center;"><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size: 16px;">दिवाळी हा प्रकाशाचा सण. त्याचा आनंद उपेक्षितांपर्यंत पोचावा, यासाठी स्वतः अंधारात राहून काम करणारे अनेक असतात. याचा अनुभव मंडईजवळच्या एकलव्य संस्थेतील मुलामुलींनी नुकताच घेतला. रेणुताई गावसकरांच्या संस्थेतील या मुलांना काही अनाम कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर नेले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या जशा सजल्या, तसेच प्रेमाने त्यांना कुल्फी, आइस्क्रीम खाऊ घालणारेही भेटले. स्वतःच्या पसंतीने नवे कपडे खरेदी करण्याचा; किल्ला, मातीची खेळणी, आकाशकंदील खरेदी करण्याचा आनंदही या मुलांनी लुटला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता दिवाळीचा प्रकाश. मिलिंद वाडेकर यांनी हा प्रकाश कॅमेऱयात टिपला आहे...<br /></span></div><div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="font-size: 16px;"><a href="http://www.esakal.com/features/261008/EKALAVYA/index.htm">स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा </a><br /></span></div></div></span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-69413183508656682772008-10-24T14:19:00.006+05:302008-10-24T14:27:40.812+05:30अदृश्य झाले प्रगतिपुस्तक... आले मार्कांचे कार्ड!जुनी अडगळ आवरायला काढली की, बरेच शोध लागतात असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. परवा हाच उद्योग करीत बसलो असताना मुलांची बालक मंदिरात असतानाची पुस् तके हाताला लागली.वाचायला मोठी गंमत वाटली. "गुलाबी मनोरा लावतो, दट्टयापेटी लावतो, भाजी निवडतो, पीठ चाळतो......' अशा स्वरूपाचा मजकुर वाचताना हाताचा वापर करायची कौशल्ये कशी वाढत गेली,विचारशक्ती, तर्कशास्त्र यांना कशी चालना मिळत गेली याचा चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला. अणि नंतर अचानक लक्षात आले, की प्राथमिक शाळेत दाखल झाल्याबरोबर ती तपशीलवार माहिती देणारे प्रगतिपुस्तक अदृश्य झाले आणि त्याऐवजी केवळ मार्कांचे आकडे मांडलेले दोन पानी कार्ड, प्रगतिपुस्तक म्हणून मिळायला लागले.<br /><br /> त्या वेळी या बदलाचे काही विशेष वाटले नव्हते; पण आज वीस वर्षांनंतर असे वाटते की, असे आणखी काही वर्षापर्यंत, निदान प्राथमिक शाळेत असेपर्यंत केले असते तर बरे झाले असते.असे वाटण्यामागे एक कारण आहे.ते असे की, हे वर्णन वाचताना त्यामध्ये कोठेही त्याला किती गुण मिळाले याचा अजिबात उल्लेख नाही.अर्थात या वेळी असे गुण दिलेही जात नसतात हे तर खरेच; पण त्यापेक्षाही त्यामधे अंगभूत कौशल्यांचे मूल्यमापन, निदान निरीक्षण होत असते ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि आता लक्षात येत आहे की, नंतर च्या संपूर्ण शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे मोजमाप, मूल्यमापन निदान निरीक्षण करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नाही.साचेबंद परीक्षा आणि त्यामधे मिळणारे गुण हे कोणाही विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन म्हणताच येणार नाही. कारण ते स्मरणशक्तीचेच प्रतीक असते.<br /><strong><em>- माधव खरे</em></strong><br /><span class=""></span>....................<br /><br /><strong><em>"डिसेलेक्सिया' शिक्षणसंस्थांचा नवा आजार....!</em></strong><br />काही दिवसांपूर्वी "तारें जमीन पर' हा "डिसेलेक्सिया' हा आजार असलेल्या मुलावर बेतलेला चित्रपट आला होता. चित्रपटासारखीच त्याची कॅचलाइनही खूप छान होती. "एव्हरी चाइल्ड इज स्पेशल'! खरंच प्रत्येक मुलाकडे विशेष अशी एक क्षमता असते. प्रत्येक मूल हे खास असतं पण त्या मुलावर लादलेल्या दप्तराच्या आणि आपल्या अपेक्षांच्या ओझ्यात आपण त्याच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्यासमोर असतं ते फक्त आकड्यांनी भरलेलं प्रगती पुस्तक. आणि त्यातले आकडेही पालकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हवे असतात. त्यामुळे मुलांना आपण केवळ परीक्षार्थी बनवतो.<br /><span class=""></span><br />हा दृष्टिकोन फक्त पालकांचाच नाही तर शाळांचाही आहे. त्यामुळेच शाळांमध्ये केवळ अभ्यासाच्या विषयांनाच महत्त्व दिले जाते (खरं तर प्रत्येक विषय हा अभ्यासाचाच असतो.आ णि ग्रेड मिळविण्यापुरतेच असलेले संगीत, शारीरिक शिक्षण, शिवण यांसारखे विषय प्रगतीपुस्तकाच्या कोपऱ्यात राहतात. मग एखादा चांगला गात असेल, एखाद्याच्या बोटातून सुरेख चित्रं साकारत असतील किंवा कोणी मैदान गाजवत असले तरी या सगळ्या गोष्टी अभ्यास संभाळून करायच्या गोष्टी! ही देखील कला असते, बुद्धिमत्ता असते आणि ती जाणीवपूर्वक विकसित करायची असते याकडे दुर्लक्ष होते.<br /><span class=""></span><br />अनेक संस्था, शाळा आता या संबंधी विचार करत आहेत. केवळ परीक्षार्थी घडविण्यासाठी प्रयत्न न करता जिज्ञासा, कुतूहल असलेले "विद्यार्थी' कसे घडतील, मुलांचा भावनिक बुद् ध्यांक कसा वाढेल यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मात्र आपल्या बंदिस्त आणि रिजिड शिक्षणपद्धतीत असे प्रयोग हे केवळ अपवाद बनून राहत आहेत. हे अपवाद "नेहमीच' व्हावेत यासाठी शिक्षणसंस्था, शिक्षक पालक सर्वांनीच आपल्या "मार्क्सवादी' विचारातून बाहेर पडून प्रयत्न करणे आवश्यक आहे.<br /><div align="center">..................<br /><strong>आपणही कधीतरी जुनी अडगळ आवरायला काढत असाल ना? आपल्या हाती असं कधी काही लागलंय, की ज्यातून घडत गेलेले बदल सहज म्हणून जाणवले. अडगळंच नाही, तर सहज म्हणूनही नवे बदल लक्षात येत असतील. नक्की कोणते बदल टिपलेय हो आपण? या बदलांनी तुम्ही कधी व्यथित झाला आहात का? की, बदल हेच प्रगतीचे मानकरी मानलेत. मला वाटतं, बदल हा हवाच. पण, तो चांगल्याकडून वाईटाकडे नको. तर, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हवा. तरच, त्या बदलाला अर्थ आहे. नाही का?<br /></strong></div>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-84242731116580141932008-10-24T13:02:00.003+05:302008-10-24T13:23:00.517+05:30"सी'च्या दुष्टचक्रात अडकलेल्या वृत्त वाहिन्याब्रेकिंगन्यूज हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. आजकाल कोणत्याही वाहिनीवर दिसणारी न्यूज ही "ब्रेकिंग'च असते.<br /><span class=""></span><br />आपापल्या चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी अशा "खपणाऱ्या' बातम्या दाखविण्याची जणू स्पर्धाच वाहिन्यांमध्ये लागलेली असते. "सबसे तेज' च्या या आंधळ्या स्पर्धेत घसरत चालेल्या नीतीमूल्यांचेही भान विसरत चालले आहे. क्राईम, क्रिकेट आणि सिनेमा या तीन "सी'मध्येच वृत्तवाहिन्या अडकलेल्या आहेत.<br /><span class=""></span><br />मात्र आपल्यामध्ये आलेल्या या स्टॅग्नेशनची आणि घसरणाऱ्या दर्जाची जाणीव खुद्द माध्यमांनाच झाली असावी. आणि म्हणूनच 2 ऑक्टोबरपासून वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन आपल्या कामाचे परीक्षण आणि नियमन करण्यासाठी यंत्रणा स्थापन केली. देशातील चौदा माध्यम कंपन्यांच्या तीस वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने "न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्डस अथॉरिटी'ची स्थापना केली आहे. माजी सरन्यायाधीश जे.एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या प्राधिकरणात वृत्तवाहिन्यांच्या चार संपादकांखेरीज इतिहासकार रामचंद्र गुहा, नॅसकॉमचे किरण कर्णिक, समाजशास्त्रज्ञ दीपंकर गुप्ता आणि अर्थतज्ज्ञ नितीन देसाई यांचा समावेश आहे.<br /><span class=""></span><br />गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर गुन्हेगारी वृत्ताचे भडक चित्रीकरण करणाऱ्या, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या, बातमीला "मनोरंजनाचे साधन' वनविणाऱ्या कार्यक्रमांचे प्रमाण वाढत आहे.<br /><br /> पीत पत्रकारिता, खरी खोटी स्टिंग ऑपरेशन, एखाद्या विषयाला विनाकारण राष्ट्रीय महत्त्व देण्याचे प्रकार वाढत आहेत.आता बातम्या हीदेखील सर्व कुटुंबानी मिळून बघण्याची गोष्ट राहिली नव्हती. त्यामुळेच काही दिवसांपासून या वृत्तवाहिन्यांना लगाम घालणे आता आवश्यक झाले आहे, अशी चर्चा जोर पकडू लागली होती. तरीही पुन्हा माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आड येत होता. त्यामुळेच माध्यमांवर सरकारी सेन्सॉरशिप लादणे, अवघड होत होते.<br /><span class=""></span><br />वृत्तपत्रांविरुद्ध दाद मागण्यासाठी, त्यांचे नियमन करण्यासाठी प्रेस कौन्सिल सारखी संस्था आहे. मात्र वृत्तवाहिन्या प्रेस कौन्सिलच्या कक्षेत येत नव्हत्या. अशावेळी वृत्तवाहिन्यांना उशीरा का होईना नियमनाची गरज भासली आणि त्यांनी त्यातून हा निर्णय घेतला ही खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे.<br /><span class=""></span><br />हा निर्णय चांगला असला तरी सरकारने आपल्याववर बंधने लादायला नको, दगडापेक्षा वीट मऊ या भावनेतून घेतलेला आहे. त्यामुळे या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सर्व वाहिन्यांचा दर्जा सुधारणार आहे, अशा भ्रमात राहण्याची आवश्यकता नाही. तरीही वाहिन्यांना स्वतःहून हे पाऊल उचलावे वाटले, हेही नसे थोडके. मात्र या सर्वांत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्व-नियंत्रण. जर आपल्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन वाहिन्यांनी आपल्या आततायीपणाला आवर घातला, तर त्यांना कोणत्याही नियनमाची गरज भासणार नाही.<br /><div align="center"><strong>क्राईम, क्रिकेट आणि सिनेमा या तीन "सी'मध्येच वृत्तवाहिन्या अडकलेल्या आहेत, असे तुम्हालाही वाटते का? या तीन सी व्यतिरिक्त वाहिन्यांनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आवडेल? मग नक्की लिहा.<br /></div></strong>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-39934725052030543182008-10-21T13:52:00.002+05:302008-10-21T13:53:26.625+05:30वीजप्रश्नात सुशिक्षितांनी लक्ष घालावे<strong>* Blogger soppy said...</strong><br />"पॉलिटिक्स बोगस आहे, त्यात उतरून ते बदलले पाहिजे..." ही एक ओल खुप कही सांगून जाते. संदीपच्या व्येथा वाचल्या, त्यात त्याने खुप सरळ आणि निरागस मते मडली आहेत. एक म्हण आहे ," घान साफ करायची असेल तर घनिमधे उतरले पाहिजे", खरच आता घान साफ करण्याची वेळ आली आहे. मी मराठवाड्यातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावाहून आहे, आणि सध्या आय टी मुंबई मधे उच्य शिक्षण घेत आहे. घरी शेती आहे, लाइट ६ तास आणि लोड शेडिंग १८ तास......!!! विज कधिपन रात्रि अपरात्री येते, आणि शेतकरी त्या त्या वेळेस उठून शेतात जातात. दिवसा काम अन रात्रि झोप नहीं. एकीकडे शौपिंगा मोल मधे विजेचा झगमगाट आणि एकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या!! गावातील जेष्ठ नागरिक म्हणतात की इन्ग्रजांच राज्य तरी बारे होते......!!! ह्याचा काय अर्थ आहे? आता तुमच्या माझ्या सुशिक्षितानी राजकारणात लक्ष्य घालण्याची वेळ आली आहे, ही घान साफ करण्याची वेळ आली आहे... Sopan Mahadeo Phapal M.Pharm (Nagpur),<br />PhD Department of Chemical Engg,<br />IIT Bombay, Powai-400076<br /><a href="mailto:Email-sopan_phapal@yahoo.co.in">Email-sopan_phapal@yahoo.co.in</a><br /><strong><em>सोप्पी यांच्याप्रमाणेच आमच्या ब्लॉगवाचकांच्या प्रतिक्रिया आणि मूळ विषय वाचा ई- सकाळवरील ब्लॉगवर... तसेच आपल्या प्रतिक्रियाही नोंदवायला विसरू नका. </em></strong>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-21457936998632974612008-10-19T13:18:00.002+05:302008-10-19T14:01:36.686+05:30"वर्दी'ची अस्वस्थतापोलिस दलात अधीक्षक- उपायुक्त पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हेतूने प्रेरित असतात. मनगटशहांवर, तसेच मंत्र्यांचे स्वीय सहायक, कर्मचारी, आदींवर कारवाई करताना दबाव आणला जातो. आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना हात लावणे शक्य नसते. ठाणे व धुळे येथील दंगलीत विनाकारण पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सुदैवाने ती कारवाई झाली नाही. पण, पोलिसांना आपल्या हातातील बाहुले बनविण्याची राजकारण्यांची वृत्ती वारंवार प्रत्ययास येते.<br /><br /> महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील हे चित्र असेल, तर बिहार, उत्तर प्रदेशात काय स्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. अलिकडेच मोठ्या शहरांत झालेल्या बॉंबस्फोटानंतर देशभर चिंतेचे वातावरण होते. तपास सुरू झाल्यावर पोलिसांना, सुरक्षा दलांना आपले काम करू देण्याऐवजी राजकारण्यांनी लुडबूड सुरू केली.<br /><br /> याबाबत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांम पित्रे म्हणाले, पोलिस दलाकडे एखादी कामगिरी दिली जाते, तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णयाचे स्वातंत्र्य त्या दलाला दिले पाहिजे. त्यांच्यावर सोपविलेल्या उद्दिष्टाविषयी संदिग्धता असता कामा नये.<br /><br /><div align="center"> <strong>आपले काय मत आहे. वरील परिस्थितीचा साकल्याने विचार केल्यास पोलिसांवरील जबाबदाऱ्या आणि त्यांच्यामधील हस्तक्षेप वाढत असल्याचं लक्षात येतं. पोलिसांच्या वर्दीतील अस्वस्थता देर करण्यासाठी राजकीय नेते, कायदेमंडळ, न्याययंत्रणा, प्रशासकीय अधिकारी या सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्यावरच एकूण समाजाचे हित अवलंबून आहे. आपल्या प्रतिक्रिया इथे जरूर मांडा. </strong></div>Vaishali Bhute, www.esakal.comhttp://www.blogger.com/profile/08569634449563779858noreply@blogger.com5