व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

मोटारींच्या प्रकाशात उमेदवारांची धावण्याची चाचणी

वेळापत्रक लांबल्यामुळे शहर पोलिस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोटारींच्या दिव्यांच्या प्रकाशात धावण्याची चाचणी पूर्ण करण्याची सोमवारी रात्री वेळ आली.
मोटारी, जीपच्या दिव्यांच्या उजेडात धावण्याची चाचणी होत असल्याचे दृश्‍य पाहण्यासाठी शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालय मैदानाबाहेर बघ्यांनी रात्री गर्दी केली होती.


पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीच्या मैदानावर दिव्यांची पुरेशी व्यवस्था नव्हती. तेथे उभारण्यात आलेल्या चार तंबूंबाहेर हॅलोजन दिवे लावण्यात आले होते; परंतु त्यांचा पुरेसा प्रकाश पडत नव्हता. त्यामुळे दहा-बारा पोलिस जीप व मोटारींचे मैदानावर कोंडाळे करण्यात आले. त्या सुरू ठेवून त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात उमेदवारांनी धावण्याची चाचणी पूर्ण केली. त्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून मोटारी व जीप मैदानावर तैनात करण्यात आल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता ही चाचणी पूर्ण झाल्यावर उमेदवार नोंदणी कक्षात पोचले. तेथे रात्री साडेनऊपर्यंत त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आयुक्तालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनाही मैदानावरून घरी निघण्यासाठी रात्रीचे दहा वाजले.

याबाबत उपायुक्त अनंत रोकडे यांनी पहिला दिवस असल्याने ही वेळ आल्याचे सांगितले असले, तरी या सर्व गोष्टी गृहित धरून आवश्‍यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे हाते. त्याबाबत गलथान राहण्याचा काहीही संबंध नव्हता, असे वाटते.

1 comments:

  1. Unknown said...
     

    Although the recent running test conducted on police parade ground after sunset in light from automobiles was unusual,nothing wrong in it, because in real life,crimes are often committed under cover of darkness and it is just as well that candidates were tested in trying circumstances to test their true mettle.

    In fact,this is the way they should be tested.Candidates desirous of joining the armed forces are put through various rigorous tests & so it is with fire brigade selection too!

    The present Mumbai municipal commissioner Dr.Jairaj Phatak,when holding post of commissioner of Pimpri Chinchwad mahanagarapalika many years ago, had insisted on candidates for fire brigade being made to undergo endurance tests,rope & tree climbing tests etc & dispensed with candidates recommended by politicians as their proteges mostly failed in these tests.

Post a Comment