व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

वाहतूक समितीची पुणेकरांना टोपी

पुण्यातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने पुणेकरांनाच "टोपी' घातली आहे. बरोबर तीन महिन्यांपूर्वी (12 सप्टेंबर) नेमण्यात आलेल्या समितीला बैठक घेण्यासाठी अद्याप मुहूर्तच मिळाला नाही. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीचे पुणेकरांचे चक्र तूर्त तरी कायमच राहिले आहे.

बेशिस्त वाहनचालक व बेफाम वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन खात्याचे नसलेले नियंत्रण, अपघातांची वाढलेली संख्या, अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांच्या संख्येत वेगाने होणारी वाढ, वाहनतळाच्या सोयीअभावी रस्ता व्यापून उभी राहणारी वाहने व कोणत्याही भागात कधीही होणारी वाहतूक कोंडी या कारणांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था धोक्‍यात आली आली आहे. या प्रश्नाकडे "सकाळ'ने "जागर'च्या माध्यमातून आवाज उठविला होता. आमदार चंद्रकांत छाजेड यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली होती. 12 सप्टेंबरला समिती अस्तित्वात आली.

राज्याच्या मुख्य सचिवांऐवजी नगरविकास विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव रामानंद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या राजपत्रात "जनतेतून आलेली मागणी व विधिमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्‍नावरून समिती नेमण्यात येत आहे,' असे नमूद केले होते. महिनाभरात पहिली बैठक घेण्यात येईल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, समिती अस्तित्वात येऊन आज तीन महिने पूर्ण झाले तरी समितीची बैठक झालेली नाही. बैठक न घेता अपघात व वाहतूक कोंडीत सापडलेल्या पुणेकरांनाच "टोपी' घालण्याचे काम समितीने केले आहे.

एखाद्या विषयात गुंतागुंत निर्माण झाली, की समिती नेमायची आणि तिढा सोडविण्याचा प्रयत्न करायचा, ही आपल्याकडील जुनी पद्धत. नागरिकही या समित्यांकडून विशेष आशा ठेवतात. पण, समितीने पुणेकरांना टोपी घातल्याने त्यांच्यावरील विश्‍वासाला तडा गेला आहे. यापुढे अशा समित्यांवर विश्‍वास ठेवायचा की नाही याचा विचार केला गेला पाहिजे.

2 comments:

  1. Anonymous said...
     

    I am writting on behalf of all IT employees working in Hinjwadi, the fat lady traffice police at wakad police station is troubling a lot to all IT people. She take bribe on some or the other reason & trouble the people. she starts with Rs. 300/- & ends with Rs. 200/- from every person. Please stop this otherwise employees stop comming to Pune & thus growth of Pune is in trouble.

  2. RJ said...
     

    Dude, just purchase a pen camera (it must be affordable for you) and do the recording. You can then post the thing on youtube and indian news channels. If the joker Jayant Umranikar sees it, there is a chance of her getting screwed..

Post a Comment