व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सातारा रस्त्यावर नियोजनाचा अभाव

रस्ते व त्यावरील सुविधा, वाहतूक, पिण्याचे पाणी, अतिक्रमणे, झोपडपट्यांतील मूलभूत सुविधांची कमतरता, सक्षम शासकीय रुग्णालयाचा अभाव आदी समस्या सातारा रस्ता परिसरात जाणवतात. महापालिकेची विकासकामे या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र नियोजन व अंमलबजावणीचा अपुरा वेग, ही त्यातील डोकेदुखी झाली आहे. त्याचा फटका या भागातील रहिवाशांना बसत आहे. त्यातील प्रमुख समस्यांचा थोडक्‍यात आढावा.

मंगेश कोळपकर

शहरातील एके काळचा सर्वाधिक चर्चेचा असलेला व अद्याप पूर्ण न झालेला विषय म्हणजे "बीआरटी.' प्रवाशांच्या दृष्टीने ही योजना मूलत: सोयीची आहे. प्रकल्प चांगला असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, पद्मावती, अप्पर, इंदिरानगर, बिबवेवाडी, प्रेमनगर, महर्षीनगर, मार्केटयार्ड परिसरातील नागरिक या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. रस्त्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले, तरी काही दुभाजक, वाहतूक दिवे आदी सुविधा अपूर्ण आहेत.
कात्रज चौक ते भारती विद्यापीठ तसेच महर्षीनगर चौकापासून जेधे चौकापर्यंत या मार्गावर दुभाजकाचे काम झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. तसेच पादचाऱ्यांनाही हा रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. त्यामुळे अरण्येश्‍वर ते मित्रमंडळ रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा रस्ता अपुरा पडतो. तसेच मार्केटयार्ड, बालाजीनगर, कात्रज या भागातही वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
बिबवेवाडी, मार्केटयार्ड, पद्मावती, सहकारनगर, बालाजीनगर, धनकवडी आदी परिसरात पी-1, पी-2, नो एंट्री आदीच्या पाट्या महापालिकेने उभारल्या आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. या संपूर्ण परिसरातील लोकसंख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. तेथून कामधंदा, नोकरी, शाळा, महाविद्यालय आदींच्या निमित्ताने नागरिकांचा मोठा लोंढा रोज शहरात येतो व रात्री परततो. त्यातील लोकसंख्येचा मोठा भाग अद्याप पीएमटी बसवर अवलंबून आहे. मात्र या भागातील बसची संख्या अत्यंत अपुरी आहे. सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बसची अवस्था पाहिली तर अनेकांना लोंबकळत व धोकादायक अवस्थेत प्रवास करावा लागतो. पीएमटीला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गांपैकी हे मार्ग असताना, बसची संख्या कमी का, याचे कोडे नागरिकांना उलगडत नाही. अप्पर, इंदिरानगर, सुखसागरनगर, भारती विहार परिसर, धनकवडी, बिवेवाडीचा काही भाग या परिसरात अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. हा भाग उंचावर असल्यामुळे अनेकदा पुरेसे पाणी तेथे पोचत नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांना वर्गणी काढून पिण्याचे पाणी भागवावे लागते. उन्हाळ्यात या भागातील टॅंकरचे पाणी मिळविण्यासाठी अक्षरश: भांडणे होतात. इंदिरानगरमध्ये सातारा रस्त्यालगत महापालिकेने 11 एकर जागेत ट्रक टर्मिनस उभारला आहे. शहरात येणारी जड वाहने तेथे थांबतील. लहान वाहनांतून त्यातील माल इच्छितस्थळी पोचविला जाईल. त्यामुळे जड वाहतूक शहरातून होणार नाही व वाहतुकीवरील ताण कमी होईल, अशी मूळ कल्पना होती. परंतु प्रशासनाच्या इच्छाशक्तीअभावी ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. आता या टर्मिनसमध्ये रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. ते तात्पुरते स्वरूपाचे आहे, असे महापालिकेकडून सांगितले जाते. या दाव्याची तथ्यता येणारा काळच ठरवेल.

1 comments:

  1. Anonymous said...
     

    This all because of Shri Suresh Kalmadi. He never thinks of anything before implementing in Pune. He has started BRT Bus Service in Pune at Satara Road, but he didn't think about the impact of it on the road and padestrians or other vehicle users, like tow, three and four wheelers.
    He should think of building flyovers where there is a square (block). Also if there is a seperate track for BRT, why the hell signals are there on each square / block ? Because of flyovers, other vehicles can cross the road without disturbance of BRT Buses.
    My kind request to Kalmadi and the Pune Munciple Corporation (PMC) that please think 10 times before implementing any new thing in Pune.

Post a Comment