व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label Rikshaw. Show all posts
Showing posts with label Rikshaw. Show all posts

वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता

पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्‍शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.

आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आणली आहे.

औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.


पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्‍नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते.

अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले. मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.

त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्‍न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात. वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.

शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते?
आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.

रिक्षाचालकांच्या बंदने प्रवाशांचे हाल

अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने जाहीर केलेल्या बंद आंदोलनात शुक्रवारी पुण्यातील रिक्षाचालकही सहभागी झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पीएमपीशिवाय पर्याय न उरल्याने पीएमपी गाड्यांना मोठी गर्दी उसळली. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे अतोनात हाल झाले.


या बंदचा सर्वांत जास्त त्रास झाला, तो परगावाहून आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांना. बॅगांची ओझी दुचाकीवरून ने- आण करताना त्यांना कसरत करवी लागत होती.

चालक "स्मार्ट' रिक्षा "हायटेक'

सर्वंकष योजनाः देशात प्रथमच पुण्यात अंमलबजावणी

मोबाईलवर फोन करताच पुणेकरांच्या दारात रिक्षा हजर होणार! पुणेरी रिक्षाचालकही लवकरच "स्मार्ट' होणार असून त्यांच्यासाठी विमा योजना, मुलांना शिक्षणासाठी कर्ज, अशी सर्वंकष "सामाजिक सुरक्षा योजना' राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रकुल युवा स्पर्धेपूर्वी ही योजना साकारली जाणार आहे. देशात ही योजना राबविण्याचा पहिला मान पुण्याला मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या वतीने फरिदाबाद येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली होती. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीची सुरवात पुण्यातून होईल. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा केली जाणार असून राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेसाठी पुण्यातील रिक्षा व्यवसायाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून होत आहे. 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे, तेथेही ही योजना राबविण्यात येईल.

परवाने (परमीट) धारक, वेळेवर कर भरणारे, कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षाचालकांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी शहरातील रिक्षाचालकांची संगणकीकृत माहिती संकलन करण्यात येणार आहे. यात रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांचे छायाचित्र, हातांचे ठसे आदींचा समावेश असेल. याअंतर्गत रिक्षाचालकांना एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण, पन्नास हजार रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल. यासंदर्भात पुण्यातील काही रुग्णालयांशी चर्चा सुरू असल्याची माहिती या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद यांनी दिली.

सततच्या वाहन चालविण्याने होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींपासून बचावासाठी रिक्षा चालकांकरिता दर महिन्याला योगासन शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. दीर्घ आजारपणामुळे रिक्षाचालक व्यवसाय करू शकला नाही तर दरमहा पुढील चार महिने चार हजार रुपये आर्थिक मदतही देण्याचा प्रस्ताव यात आहे. मुलांच्या शिक्षण आणि मुलींच्या लग्नासाठीही त्यांना कर्ज मिळेल, असे वैयक्तिक फायद्यांसह संपूर्ण व्यवसायाचे चित्र बदलणारी ही योजना लवकरच कार्यान्वित होईल.

"एलपीजी किट' बसविण्यासाठी मदत देण्याबरोबरच काळा पिवळा रंग कायम ठेवून रिक्षाचे "हूड' दुसऱ्या रंगात दिसेल. संपूर्ण शहरात या योजनेतील रिक्षांची एक वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी "हूड'चे नवीन डिझाईन करण्याचे काम सुरू आहे. आकर्षक गणवेश, बूट अशा पोशाखात आणि हातात मोबाईल असलेला रिक्षाचालक पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. या व्यावसायिकासाठी कॉल सेंटर सुरू करण्याची कल्पना असून प्रवाशाला आता दारात रिक्षा मिळण्याचे समाधान लाभेल. कॉल सेंटरला फोन केला, की मोबाईलवर रिक्षाचालकाला माहिती दिली जाईल. तो त्वरित तेथे सेवेला हजर होईल. या मोबाईलसह रिक्षाचालकांच्या घरीही एक मोबाईल कनेक्‍शन दिला जाईल. "अर्बन मास ट्रान्सिस्ट कंपनी', "इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्स्पोर्ट' यांचे सहकार्य योजनेला मिळणार आहे, अशी माहिती आनंद यांनी दिली.

रिक्षाचालकांना स्मार्ट बनविण्यासाठी क्रेद्र शासनाने पुढाकार घेतला, ही बाब स्तुत्यच..पण, आकर्षक गणवेश, बूट, मोबाईल दिल्याने तो स्मार्ट बनेलच असे नाही. कारण, पुण्याच्या रिक्षावाल्याचे किस्से सर्वदूर पसरले आहेत. आरेरावी, उद्धट बोलणे, बेशिस्तपणा आणि फसवणूक करण्याची वृत्ती या रिक्षावाल्यांमध्ये ठासून भरली आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या या माणसिकतेत बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यापूर्वी या रिक्षावाल्यांकडून चांगल्या वर्तणुकीचे धडे गिरवून घेतले पाहिजेत. तरंच, पुण्यातील रिक्षा खऱ्याअर्थाने हायटेक होतील.

वाहत्या मुठेत रिक्षा स्वच्छता...

वाहत्या गंगेत हात धुणं, ही म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. गंगेत नाही; पण दुधडी भरून वाहणाऱ्या मुठेत रिक्षा धुवून पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी या म्हणीचा व्यावहारिक उपयोग सिद्ध केलाय.