
पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढ
पीएमपी गाड्यांच्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी भाड्यात वाढ करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता. २१) करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी तीन रुपये भाडे आकारण्यात येते. ते कायम ठेवण्यात आले आहे. चार किलोमीटरसाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये, सहा किलोमीटरसाठी सहा रुपयांऐवजी सात रुपये भाडे आकारण्यात येईल. १८ ते २६ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात दोन रुपयांनी, तर २६ ते ३० किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ३० ते ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात चार रुपयांनी, तर ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
डिझेलची दरवाढ झाल्याने, जुलैमध्ये प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रत्येक टप्प्यासाठी एक रुपया भाडेवाढ करावी, असे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले होते. एक दिवसीय सवलतीचा दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील पासचा दर सध्या ४५ रुपये असून, तो ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्या व्यतिरिक्त विविध अटी पीएमपीला घालण्यात आल्या आहेत.'' देखभाल दुरुस्तीचे नियोजन नीट करण्यात यावे, कमी उत्पन्नाच्या मार्गाचे सर्वेक्षण करून तेथे नवीन वेळापत्रक तयार करावे, सेवकांच्या कंत्राटी पद्धती व नियुक्त्यांवर निर्बंध घालावेत, चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त अन्य सेवकांच्या नियुक्त्या करण्यात येऊ नयेत, अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बसमार्गांचे फेरनियोजन करावे, दरवाढीनंतर तीन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा प्राधिकरणाला सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
डिझेलची दरवाढ झाल्याने, जुलैमध्ये प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रत्येक टप्प्यासाठी एक रुपया भाडेवाढ करावी, असे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले होते. एक दिवसीय सवलतीचा दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील पासचा दर सध्या ४५ रुपये असून, तो ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्या व्यतिरिक्त विविध अटी पीएमपीला घालण्यात आल्या आहेत.'' देखभाल दुरुस्तीचे नियोजन नीट करण्यात यावे, कमी उत्पन्नाच्या मार्गाचे सर्वेक्षण करून तेथे नवीन वेळापत्रक तयार करावे, सेवकांच्या कंत्राटी पद्धती व नियुक्त्यांवर निर्बंध घालावेत, चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त अन्य सेवकांच्या नियुक्त्या करण्यात येऊ नयेत, अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बसमार्गांचे फेरनियोजन करावे, दरवाढीनंतर तीन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा प्राधिकरणाला सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
प्रवासी भाडेवाढीस मान्यता देताना प्राधिकरणाने पीएमटीला काही अटी घातल्या आहेत. त्यातील भाडेवाढीची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. मात्र, प्रवाशांच्या हितासाठीच्या या अटींना फाटा मिळू शकतो. आता या अटींची पूर्तता होतेय की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रवाशांचीच आहे. आपल्या काय वाटते?