व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

वरवरची मलमपट्टी नको, शाश्‍वत विकास हवा...?

राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशोदेशीतून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज होत आहे. वातावरण निर्मितीला चांगलाच जोर चढलाय. भित्तिचित्रे रंगविण्याबरोबरच, सुशोभीकरण, डांबरीकरण आणि इतर विकासकामांना वेग आला आहे. किंबहुना शहरातील कोणत्याही भागात गेल्यास विविध कामं सुरू असल्याचे चित्र दिसते.

आतापर्यंत खड्ड्यात शोधावा लागणारा रस्ता खड्डेविरहित झाला आहे. तर त्या रस्त्यांवर दुभाजकांचा पत्ता नव्हता तेथे दुभाजक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे चित्र रंगविण्यासाठी शहरातली एकही भिंत सोडलेली नाही. विकास आणि निसर्ग शहरात हातात हात घालून चालतात, असा भास निर्माण करण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावली जात आहेत. स्वच्छ आणि सुंदर पुणे या संज्ञेखाली रस्त्यांची सफाईही रोजची बाब झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग उभारले जात आहे. "पीएमपीएलएम'ने ही कंबर कसली असून, सीवायजी या नवीन बस आपल्या ताफ्यात रुजू केल्या आहेत. अशाप्रकारे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्व यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्या आहेत.

शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्‍वत विचार अजिबात झालेला नाहीये.

पण, अशाप्रकारची वरवरची मलमपट्टी काय कामाची. शहराचा विकास दूरदृष्टी ठेवून झाला पाहिजे. 2010 साली तर पुन्हा राष्ट्रकुल होणार असेल, तर हा विकास त्या स्पर्धेपर्यंत टिकायला हवा. नाही का?

6 comments:

  1. roha-prafull.blogspot.com said...
     

    Shaharatali vahtuk vyavastha sudharavi ya karita kahi mudde:
    1)Rastya vareel 60% duchaki dharak traffic signal kade baghatach nahit, tyamule sarv traffic signal kadhun takavet, tyamule vahukila lagnara vel vachel, signal sathi lagnari jaga vachel and mukhya mhanaje signal sathi lagnari veej vachel, tyamule veej sankatavar ha todga asu shakato.

    2)Pune mahanagarpalike kadun asa fatva kadhnyat yava ki jyanna duchaki swayamchalit vaahane chalvata yet nahit jya madhye jyeshtha vayeen streeya va purush, lahaan mule, apang vyakti yaanche pramaan jast ahe, ani jyanna duchaki swayamchalit vaahane chalavane paravadat nahi tyanna Punyat rahnyacha kahi ek hakka nahi. Tyanni tvarit Pune sodave. Sarvajanik vahtuk vyavasthe var je avalamboon asataat asha sarvansathi ha kayda lagu asava

    3)Punyatil mukhya raste he fakt vaahanan sathi rakheev asavet, tithe payi chalnaryanna parvanagi asu naye, rastya varil padcharyacha jar traffic signal na palnarya vahanacha dhakka lagun apghat jhala tar tya paadcharya la tvarit dand karava. Jar ekhadya lahaan mulala kinva vayovurdhha vyaktila vaahanan chya horns mule kinva dhura mule traas zala tar tyanna dekheel kadak dand karava.

    Vareel mudde lakshat gheun Pune Mahanagarpalikene, PMPML ne ani Vahtuk Police vibhagane aapapalya marji pramane kruti karanyachi krupa karavi.

  2. Anonymous said...
     

    Shaharatali vahtuk vyavastha sudharavi ya karita kahi mudde:
    1)Rastya vareel 60% duchaki dharak traffic signal kade baghatach nahit, tyamule sarv traffic signal kadhun takavet, tyamule vahukila lagnara vel vachel, signal sathi lagnari jaga vachel and mukhya mhanaje signal sathi lagnari veej vachel, tyamule veej sankatavar ha todga asu shakato.

    2)Pune mahanagarpalike kadun asa fatva kadhnyat yava ki jyanna duchaki swayamchalit vaahane chalvata yet nahit jya madhye jyeshtha vayeen streeya va purush, lahaan mule, apang vyakti yaanche pramaan jast ahe, ani jyanna duchaki swayamchalit vaahane chalavane paravadat nahi tyanna Punyat rahnyacha kahi ek hakka nahi. Tyanni tvarit Pune sodave. Sarvajanik vahtuk vyavasthe var je avalamboon asataat asha sarvansathi ha kayda lagu asava

    3)Punyatil mukhya raste he fakt vaahanan sathi rakheev asavet, tithe payi chalnaryanna parvanagi asu naye, rastya varil padcharyacha jar traffic signal na palnarya vahanacha dhakka lagun apghat jhala tar tya paadcharya la tvarit dand karava. Jar ekhadya lahaan mulala kinva vayovurdhha vyaktila vaahanan chya horns mule kinva dhura mule traas zala tar tyanna dekheel kadak dand karava.

    Vareel mudde lakshat gheun Pune Mahanagarpalikene, PMPML ne ani Vahtuk Police vibhagane aapapalya marji pramane kruti karanyachi krupa karavi.

  3. Anonymous said...
     

    पुण्यात किंवा इतर शहरात विकासाच्या नांवाखाली अमाप पैसे खाणे व थोडे दिवसपण न टिकणारी निकृष्ट कामे करणे यात नाविन्य कांहीच नाही!

    येथिल खासदार महानगरपालिकेतील सत्ता गेल्यानंतर इतर पक्षांच्यावर शिंतोडे फ़ेकत आहे,पण कित्येक वर्षे सत्ता उपभोगतांना शहराचा थोडाफ़ार विकास करतांना स्वतःच्या व पक्षाच्या तुमड्या भरण्यापेक्षा दुसरे कांहीच केले नाही!

    त्यानंतर आलेले पालकमंत्री कित्येक जमिनी घेण्यात गुंग आहेत व जनतेच्या डोळ्यात धूळफ़ेक चालूच आहे! ज्या सत्ताधारी पक्षांना व पुढा-यांना स्वविकासाच्यापलिकडे दूसरे कांहीच दिसत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येणार?
    पण निर्लज्जम सदासुखी!!!

    निवडून आले की यांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे आहे असे समजून यांचे वर्तन असते! श्री.आर.आर.पाटील यांच्यासारखे साधे व स्वच्छ वर्तन असलेले एखादाच अपवाद!
    बाकी बहुतेक संधिसाधू,अप्पलपोटे,स्वार्थी,मतलबी व कुठलेहि प्रामाणिकपणाचे व सचोटीचे तत्व नसलेलेच!

    आता राष्ट्रकुल स्पर्धा होइपर्यंत खासदार व त्याचे चमचे व राज्यकर्ते स्वतःचा खुप उदोउदो करून घेणार,विकासाच्या नांवाखाली मलमपट्टी करतांना जेवढे जमेल तेवढे खिशात घालणार,सकाळ वर्तमानपत्र ठराविक लोकांना प्रचंड प्रसिद्धी देणार हे सर्वश्रुतच आहे! कुठल्याहि टिकाउ विकासाच्या अपेक्षा केल्यात तर तुमची उपेक्षाच होणार!!!
    त्यापेक्षा थोडे दिवस कां होइना,जराशी झालेली सुधारणा उपभोगुया!

  4. Anonymous said...
     

    पुण्यात किंवा इतर शहरात विकासाच्या नांवाखाली अमाप पैसे खाणे व थोडे दिवसपण न टिकणारी निकृष्ट कामे करणे यात नाविन्य कांहीच नाही!
    ---
    Can the mantri-ji give a total break-up of Rs. 2000 Crore that is spent on the concrete road from university to the balewadi stadium.
    People would also like to know why this brand new road is like this.

  5. Anonymous said...
     

    शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्‍वत विचार अजिबात झालेला नाहीये.
    ----
    2000 Cr. khanya-saathi chalavlela ha sagala khataa-top aahe.
    Leaders who rule pune, don't live in pune. They are outsiders and don't care about the real development.

  6. Anonymous said...
     

    ही सगळी वरवरची मलमपट्टी आहे हे जगाला ओरडून सांगण्याचे काम प्रसारमाध्यमांचे आहे. प्रसारमाध्यमांनो पैसा खाऊ नका आणि सत्यस्थिती जगाला दाखवून द्या. पण हे डुक्कर जगापुढे तरी लाजतील का याची शंका वाटते. भारतमातेवर रोज हल्ले होत असूनसुद्धा या XXXXXना शरम वाटत नाही.

Post a Comment