व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

गरिबी निर्मूलनाचे भारतीय मॉडेल

पाश्‍चिमात्य प्रतिमानानुसार आर्थिक मागासलेपणा, हे गरिबीचे कारण आहे. मग भारताचा काहीसा आर्थिक विकास झाला असताना गरिबी कमी का होत नाही? भारतातील गरिबी हटविण्यासाठी भारतीय मॉडेलचीच गरज आहे.

अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील "आर्थिक किल्ले' कोसळू लागले आहेत. खासगी आर्थिक संस्थांनी दिवाळे जाहीर करायचे आणि सरकारने त्या संस्थांना कडेवर घ्यायचे, ही गोष्ट अमेरिकेत नवी नाही. मात्र या दिवाळीखोरीत जगातील आर्थिक व्यवहार होरपळून निघताहेत, हे प्रथमच पाहायला मिळते आहे. उदारमतवादी जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून असे धक्के हे आता अपरिहार्य आहेत, असे अर्थतज्ज्ञ सांगतील.

मात्र उदारीकरण, जागतिकीकरणातूनच भारतातील गरिबीचे निर्मूलन आणि आर्थिक विकास होईल, असे जे सांगितले जात होते त्याचे काय झाले, असा प्रश्‍न १७ वर्षांनी विचारला तर त्याचे उत्तर काय आहे? चीन-भारतासारख्या देशांचा आर्थिक विकासदर वाढला असताना तेथे दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या का वाढत चालली आहे? याच काळात भारताचा मानवी विकास निर्देशांक का वाढला नाही? अर्थव्यवस्था मजबूत आहे, तर चलनवाढीचा दर म्हणजे महागाई का वाढत चालली आहे? सर्वांना समान संधी देणारे शिक्षण गरीब आणि मध्यम वर्गाला परवडेनासे का झाले आहे? १९९१ नंतरच्या खुल्या आर्थिक धोरणांनंतर भारतात आर्थिक समृद्धीची लाट आली खरी; मात्र ती या देशाच्या प्राथमिक आणि मूलभूत प्रश्‍नांना का मार्ग दाखवीत नाही?

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍समधील माजी प्राध्यापक हारवर्ड आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे भूतपूर्व फेलो आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे नायजेरिया, आफ्रिका देशाचे तज्ज्ञ (लोकसंख्या) वसंत प्रभाकर पेठे यांना हे आणि असे अनेक प्रश्‍न पडले. गरिबी निर्मूलन आणि आर्थिक विकासाच्या नव्या भारतीय मॉडेलचे प्रारूप त्यांनी तयार केले. गेली चार वर्षे या आर्थिक मॉडेलवर ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. पाश्‍चात्त्य मॉडेल्सचे अंधानुकरण थांबवून आपली अस्मिता, प्रतिभा आणि संस्कृती यांनाच अनुरूप असे मॉडेल आपण स्वयंप्रज्ञेने विकसित केले पाहिजे, असे प्रा. पेठे आग्रहाने मांडत आहेत.

प्रा. पेठे यांचे हे मॉडेल दोन भागांत विभागले आहे. पहिल्या भागात पाश्‍चिमात्य प्रतिमानांचे खंडन करण्याची गरज का आहे याचे विवेचन, तर दुसऱ्या भागात या मॉडेलच्या नव्या प्रतिमांचे सादरीकरण करण्यात आले आहे. जागेच्या मर्यादेमुळे पहिल्या भागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आपण डॉ. पेठे यांच्या नव्या प्रतिमांचा अधिक विचार करणार आहोत. आपल्या देशाची गेल्या २० वर्षांत "भारत' आणि "इंडिया' अशी जी फाळणी झाली, तिची दरी सातत्याने वाढत चालली आहे. या फाळणीत १९९१ च्या उदारीकरणामुळे कशी भर पडते आहे, याची उदाहरणे प्रा. पेठे यांनी दिली आहेत.

"अमेरिकन भांडवलशाली'च्या जागतिकीकरणामुळे त्या तालावर नाचणाऱ्या आपल्या अर्थकारणाचे दुष्परिणाम यापुढे अधिक तीव्रतेने जनतेला भोगावे लागतील, असे प्रा. पेठे यांनी सप्टेंबर २००४ मध्ये म्हटले होते. त्याची प्रचिती अलीकडच्या लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी आणि मेरिल लिंच कंपनी अडचणीत आली, यांसारख्या काही घडामोडींमध्ये येऊ लागली आहे. या कालखंडात कल्याणकारी रचनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मानवी चेहरा कलंकित झाला आणि लोकशाहीचेही विडंबन झाले. पर्यावरणाचा विनाश अधिक वेगाने सुरू झाला. "मॅमनिझम' म्हणजे पैसा हेच सर्वस्व या विकृत मानसिकतेमुळे भारतीय संस्कृतीवर आक्रमण झाले. मानवी विकास निर्देशांकात सुधारणेऐवजी घसरण झाली. तेजी- मंदीचे झटके वाढले.

महाकायतेला प्राधान्य दिल्यामुळे रोजगार निर्माण करणारे उद्योग बंद पडले, यासंबंधीचे विवेचन त्यांनी केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकास आणि दारिद्य्र निर्मूलन ही दोन्ही उद्दिष्टे उदारीकरणात साध्य होताना दिसत नाहीत; तसेच दुष्परिणामांच्या रूपात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीऐवजी ते अधोगतीकडे नेणारे ठरले आहे, त्यामुळे अंधानुकरण आता थांबवले पाहिजे, असे प्रा. पेठे ठामपणे सांगतात.

मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक
प्रा. पेठे यांच्या मॉडेलचा दुसरा भाग अधिक महत्त्वाचा आहे. भारतासमोरील प्राथमिक, तसेच मूलभूत प्रश्‍नांची उकल त्यांनी त्यात केली आहे. भारतातील गरिबी आणि आर्थिक विकासाविषयीच्या मूलभूत प्रश्‍नांची मांडणी करत हे मॉडेल पुढे जाते. पाश्‍चिमात्य प्रतिमानानुसार आर्थिक मागासलेपणा हे गरिबीचे कारण आहे. मग भारतात काहीसा आर्थिक विकास झाला तरी गरिबी का कमी होत नाही, असा प्रश्‍न ते उपस्थित करतात.

गरिबी का, याचे प्रा. पेठे यांचे उत्तर असे आहे - १) व्यक्तीच्या निसर्गदत्त अशा मौल्यवान पण सुप्त गुणवत्तेचे इष्टतमीकरण न होणे किंवा अत्यल्प होणे. २) गुणवत्तासंवर्धनासाठी अत्यावश्‍यक अशा समान संधीचा अभाव. ३) चंगळवाद, शस्त्रास्त्रांवरील अफाट खर्च, शिष्टजन अभिमुखी नियोजन. ४) राजकीय हितसंबंध, लोकप्रतिनिधींमधील अनाचार. ५) कालबाह्य समाजरचना, नैतिक अवनती. ६) सत्‌-असत्‌ प्रवृत्तीच्या संघर्षात दुष्ट प्रवृत्तींचा विजय.

गरिबीच्या या सर्व कारणांची सविस्तर चर्चा प्रा. पेठे यांनी मॉडेलमध्ये केली असून काय करायला हवे, याचे दिशादर्शनही केले आहे. व्यक्तिविकासात शिक्षण, आरोग्य, सुसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करून या मूलभूत प्रश्‍नांविषयी पाश्‍चिमात्य मॉडेल काही बोलतच नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली आहे. व्यक्तीप्रमाणेच गावातील गुणवत्तेचे (स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती) इष्टतमीकरण करण्याची गरज आहे. विषमता जन्माधारित आणि मानवनिर्मित आहे. अशा विषमतेला भांडवलशाही खतपाणीच घालते, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. समता निर्माण करण्याचे प्रभावी साधन म्हणून आपण शिक्षणाकडे पाहतो; मात्र भांडवलशाहीत ते शिक्षणच विषमतेचे कारण होऊ लागले आहे, हेही ते लक्षात आणून देतात.

भोगवादामुळे वस्तूंना मागणी वाढते आणि त्यामुळे उत्पादन, रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढते, हा युक्तिवाद उथळ असून, उधळमाधळीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या पैशांची गुंतवणूक शेती आणि रोजगारवाढीसाठी लघुउद्योगांमध्ये केली तर राष्ट्रीय उत्पन्नात मोठी भर पडेल, असे ते सांगतात. श्रीमंतांच्या उधळमाधळीचे समर्थन करणारे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे, असा आरोप ते करतात. विकासाचे प्रतिमान हे गरजाधिष्ठितच हवे; ते भोगवादाधिष्ठित असता कामा नये, हे महात्मा गांधींनी वेळोवेळी सांगितले आहे. भारतासारख्या शेतीप्रधान, एकशेदहा कोटी लोकसंख्येच्या, खंडप्राय, वैविध्य असलेल्या विकसनशील देशाला तो विचार नव्या संदर्भांनी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असेही प्रा. पेठे यांचे मॉडेल सांगते. उदारीकरणाचे जे परिणाम आज दिसत आहेत ते पाहता, भारताला या प्रकारचे मॉडेलच आगामी संकटांमधून वाचवू शकेल. त्यामुळे प्रा. पेठे यांच्या मॉडेलवर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे.

(संपर्कासाठी - प्रा. पेठे - ०२०- २५४३०२५३)
pethevapr@yahoo.com

यमाजी मालकर
email - yamaji.malkar@esakal.com

3 comments:

  1. Unknown said...
     

    सकाळीच सकाळमध्ये हा लेख वाचला. प्रा. पेठे यांचे मॉडेल मनाला पटणारे असले तरी ते प्रत्यक्षात येऊ शकेल असे वाटत नाही.

    उदारीकरणापूर्वी भारतीय बाजारपेठ गरजाधिष्ठितच होती. उदारीकरणानंतर भांडवलशाही माजली व त्यामुळे भांडवल असणारे(हुजुर) आणि भांडवल नसणारे(मजूर) अशी लोकांची उभी फाळणी झाली. ज्याच्या हाती पैसा त्याचीच प्रगती हे सार्वकालिक सत्य आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे ही दरी वाढतच गेली.

    प्रा. पेठे यांचे मॉडेल आशावादी वाटले तरी हे उपयोगात आणणे आजघडीला तरी कठीण वाटते. उदारीकरण ही एकाच दिशेने जाणारे असून ते मागे घेणे शक्य नाही कारण भांडवलदारांचे अब्जावधी डॉलर्स आणि करोडो मजुरांचे हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. आता एक वेगळे मध्यममार्गी (intermediate)मॉडेल बनवावे लागेल जे सध्याच्या भांडवलशाही मॉडेल आणि प्रा. पेठे यांच्या मॉडेलमधले असेल ज्यामुळे सर्व लोकांना विकासाची समान संधी मिळेल.

  2. Anonymous said...
     

    As is predicted, the USA economy is going down day by day. What you see is the CREDIT CARDS, LOANS, GREED for HOMES, MONEY that is getting USA economy down. US and western capitalizm is ending.

    As rightly said by many saints and gurus in Hindustan, Peace of mind is more important than riches. Common person in India needs necessities. Its the english media that is marketing the west in INDIA. Their funds are coming from west, so they have to market the western ideas.

    What a common man accepts is up to him. If he is satisfied with what he has, peace is gained. Credit Cards, Cars, multiple homes, Drinking, Smooking are todays RAVAANA or BHOOTS or RAKASHASA. If you accept their way, they will lead you to HELL (unpeaceful life), rejecting them and staying contained with minimum loans is HEAVEN (Peaceful LIFE).

  3. Anonymous said...
     

    The average pay in USA is US$ 39000.00

    That means you get US$ 3250/- PM before tax.

    Professional Tax US$ 30/- PM

    Then comes Federal Income Tax US$ 200/- PM

    Then comes Social Security Tax US$ 150/- PM

    Then comes Medicare Tax US$ 50/- PM

    Then comes Family of three health insurance US$ 150/- PM

    Then comes Auto LOAN US$ 200/- PM

    Then Comes Auto INSURANCE US$ 50/- PM

    THEN COMES RENT for HOME US$ 500/-PM

    THEN COMES UTILITIES for HOME US$ 40/- PM

    Then COMES LOCAL PHONE US$ 40/- PM

    THEN COMES INDIA PHONE CARDS $ 20/- PM

    THEN COMES GAS FOR CAR $ 60/- PM

    THEN COMES GROCERIES FOR HOME US$ 300/- PM

    THEN COMES DIAL UP INTERNET $ 10/- PM

    Entertainment/movies $ 100/- PM

    Clothes/Accessories $ 100/- PM

    STATE TAXES for CAR US$ 20/- PM
    Parking TAX for car US$ 20/- PM

    --------------------------
    Total balance = 3250-2220=1000/- $US PM
    -------------------------

    If you plan a trip to INDIA, all your saving is goen. Plus you have no leave, no relatives, YOU, YOUR CAR, YOUR FAMILY and YOUR TAXES.

    THE ROAD TO RICHES AFTER COMING TO AMERICA IS at least 20 years! AMERICA IS NOT A EASY DESTINATION.

    WITH ECONOMY GOING DOWN given rise to discrimination, lesser jobs and more risks for such a small saving. INDIA IS BETTER AND PEACEFUL!

    Yes moreover, if you buy a home, your home is worth half in USA now. Then comes city tax for home, fire insurance for home, flood insurance separate for home, etc.

    HARD work never pays off. An INDIAN will always remain INDIA, and if time comes, HIRE AND FIRE! Let to go! COMMON MAN IN INDIA IS BETTER OFF THEN the marketing by USA/WEST to come and pay these taxes for them.

Post a Comment