दोन रुपयांनी दरवाढ?
पीएमपी'चा प्रस्ताव ः संचालक मंडळाचा दोन दिवसांत निर्णय
डिझेल दरवाढीमुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी तिकीटदरात किमान एक ते कमाल दोन रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रशासनाने घेतला आहे. प्रस्तावित दरवाढीचा ठराव प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवला असून, येत्या दोन दिवसांत संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल.
पेट्रोलच्या दरात पाच रुपये, तर डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका "पीएमपी'ला बसणार आहे. या वाढीमुळे "पीएमपी'वर दररोजचा दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा बोजा पडणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन पीएमटीच्या वतीने तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डिझेलच्या दरात तीन वेळा वाढ झाली, तर दोन वेळा कपात झाली; परंतु प्रशासनाने तिकीटदरात कोणतीही वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही; मात्र आता झालेली वाढ मोठी असल्यामुळे दैनंदिन तोटा सोळा लाखांवर गेला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तिकीटदरात एक ते दोन रुपयांनी वाढ करावी. त्यामुळे सध्या येणारा तोटा काही प्रमाणात कमी होईल. त्यावर एकमत होऊन ही दरवाढ सुचविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
डिझेल दरवाढीमुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी तिकीटदरात किमान एक ते कमाल दोन रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रशासनाने घेतला आहे. प्रस्तावित दरवाढीचा ठराव प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवला असून, येत्या दोन दिवसांत संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल.
पेट्रोलच्या दरात पाच रुपये, तर डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका "पीएमपी'ला बसणार आहे. या वाढीमुळे "पीएमपी'वर दररोजचा दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा बोजा पडणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन पीएमटीच्या वतीने तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डिझेलच्या दरात तीन वेळा वाढ झाली, तर दोन वेळा कपात झाली; परंतु प्रशासनाने तिकीटदरात कोणतीही वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही; मात्र आता झालेली वाढ मोठी असल्यामुळे दैनंदिन तोटा सोळा लाखांवर गेला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तिकीटदरात एक ते दोन रुपयांनी वाढ करावी. त्यामुळे सध्या येणारा तोटा काही प्रमाणात कमी होईल. त्यावर एकमत होऊन ही दरवाढ सुचविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या तिकीट दरवाढीमुळे नागरिकांवरही फार बोजा पडणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी आगोदरच्या विविध बोजाखाली दबलेल्या सर्वसामान्यांना जीव गुदमरला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी कसं जगायचं, हा प्रश्न आहे.
आपल्याला काही पर्याय सुचतोय का? आम्हाला या ब्लॉगवर लिहून पाठवा...
0 comments:
Post a Comment