व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

केंदूर ग्रामसभेत संतप्त महिलांकडून दगडफेक

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

दारूबंदीसाठी आयोजित केलेल्या महिला ग्रामसभेत महिलांच्या उपस्थिती संख्येबाबत प्रशासनाकडून मतभेद झाल्यामुळे, संतप्त महिलांनी दगडफेक, मतदार नोंदवही फोडणे, खुर्च्या, टेबलची मोडतोड करून ग्रामसभा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर महिलांनी गावातील शासनमान्य दारू दुकानाचीही मोडतोड करून संताप व्यक्त केला. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शासनाच्या नवीन दारूबंदी विधेयकानुसार महिला ग्रामसभेला सुरवात झाली. गटविकास अधिकारी राहुल साकोरे यांच्या नियंत्रणात असलेल्या या ग्रामसभेत महिला आपली मतदार ओळखपत्रे दाखवून येत होत्या. काही वेळाच्या टप्प्याने महिला येणाऱ्या मतदार महिलांची आकडेवारी घेऊ लागल्या. मात्र, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने आकडेवारीबाबत वेगवेगळी उत्तरे दिली. यामुळे प्रशासन दारू दुकानदारांशी संगनमत करून कमी आकडेवारी दाखवत असल्याचे सांगून, महिलांनी नोंदवही फेकणे, खुर्च्या फेकणे, टेबल मोडणे आदी प्रकार करण्यास सुरवात केली. काही वेळातच याला हिंसक वळण लागले आणि जमावाकडून उपस्थित कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू झाली. ग्रामविकास अधिकारी श्रीकांत ढमढेरे यांनाही मारहाण करण्यात आली. जमावाकडून बचावासाठी जवळच असलेल्या घरात श्री. ढमढेरे यांना काही कार्यकर्त्यांनी नेले असता, या घरावरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा दारू दुकानाकडे वळविला. दारू दुकानाची मोडतोड करून दारू बाटल्याही फोडण्यात आल्या. यानंतर पुन्हा गावातील मुख्य चौकात येऊन महिलांनी भाषणे केली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांच्याशी चर्चा करण्यात आली. "आम्ही दोन ते अडीच हजार मतदार आणले होते. ग्रामसभा घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे आत्ताच जाहीर करा' असे म्हणत महिलांनी प्रशासनाला तातडीने निर्णय देण्याची मागणी केली. गटविकास अधिकाऱ्यांनी ही मागणी तातडीने मान्य करण्याबाबतही महिलांनी आग्रह केला. तसेच याबाबत जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याशीही मोबाईलवर संपर्क साधला. दरम्यान, याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

0 comments:

Post a Comment