व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कधी सुटणार बीआरटीचा तिढा?

कात्रज ते हडपसर बीआरटी मार्गादरम्यान वाहतूकसमस्या सुरळीत होण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत आहे.
वाहतूक तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे बीआरटी प्रकल्प अपयशी ठरला असल्याचा आरोप बीआरटी सुधारणा नागरी कृती समितीच्या वतीने गुरुवारी परिषदेत करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष दिगंबर डवरी आणि कृष्णा गायकवाड उपस्थित होते. डवरी म्हणाले, ""मागील वर्षी बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. त्याच वेळी फूटपाथ आणि सायकल ट्रॅकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा ही बांधकामे उखडून टाकून पुन्हा नव्याने फूटपाथची उंची वाढवण्याचे काम चालू करण्यात आले आहे. या कामात जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. हडपसर ते कात्रज या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी प्रकल्प पूर्ण होत नाही, तोवर अन्य खासगी वाहनांना त्या मार्गातून जाण्याची परवानगी देण्यात यावी.''

बीआरटीसारखा पथदर्शी प्रकल्प अकार्यक्षम अधिकारी आणि नियोजनाच्या अभावामुळे अपयशी झाला असल्याची खंत श्री. गायकवाड यांनी व्यक्त केली. योजनेची चुकीची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात जनआंदोलन उभारू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

आंदोलनाने बीआरटीचा प्रश्न सुटेल का? आणि मुळात एका चांगल्या, पथदर्शी योजनेची वाट लावणाऱयांवर काय कारवाई झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटते?

1 comments:

  1. Anonymous said...
     

    Should the action taken against those officials, it that a question? All readers are going to say yes yes yes but nothing is going to happen. We know it from experience. While PMT (or PMP or whatever the bus service is now called) does not have 40 crores for the buses, BRT got 500 crores for the scheme. Why don't they just buy 200 buses for PMT and let there be a bus leaving every 3 minutes from Varje to Lohegaon airport and back. The buses should be air conditioned, the conductors and drivers courtenous and the travel cheap. Slap a parking fee from private vehicles everywhere on public streets and cross-subsidize public transport with that. Half the traffic in western Pune will disappear overnight.

    We don't need fancy schemes. We need public transport that is cheap, quick and dignified way of commuting. You don't have to travel abroad at public expense to study what they do. Why can't you use your own brain for once?

Post a Comment