सल्लागार नको, पाणी हवे !
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना करण्यासाठी स्थायी समितीपुढे असलेला सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव वादग्रस्त ठरत असतानाच, या कामासाठी दोन महिन्यांपूर्वी आणखी एक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पालिकेच्या या "तिसऱ्या' सल्लागाराने स्थायी समितीसकट सर्वच लोकप्रतिनिधींचीही "विकेट' घेतली आहे. या कामासाठी नक्की किती सल्लागार नियुक्त करणार, असा प्रश्न आता पालिकेच्या वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना करण्यासाठी "आयएलएफएस' या संस्थेशी करार करण्यात आला आहे. तरीही आणखी एक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असल्याचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर बैठकीमध्ये या विषयावरून सत्तारूढ पक्षामध्येच वाद झाले होते.
याच कामासाठी याच स्थायी समितीने दीड महिन्यापूर्वी युनिटी कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला सल्लागार नियुक्त केल्याची माहिती आता पुढे आली आहे.
यापूर्वी जून २००७ मध्ये "आयएलएफएस' या संस्थेलाही याच कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.
शहरातील अनेक भागांना जानेवारीपासून टॅंकरची वाट पाहात बसावे लागते. पाणी दुसऱया मजल्याच्या वर पोहोचत नाही, अशी स्थिती तर दररोज असते. आता, तीन तीन सल्लागार नेमून तरी पाणी नीट मिळेल का? हा खरा कळीचा प्रश्न आहे...!
पालिकेच्या या "तिसऱ्या' सल्लागाराने स्थायी समितीसकट सर्वच लोकप्रतिनिधींचीही "विकेट' घेतली आहे. या कामासाठी नक्की किती सल्लागार नियुक्त करणार, असा प्रश्न आता पालिकेच्या वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना करण्यासाठी "आयएलएफएस' या संस्थेशी करार करण्यात आला आहे. तरीही आणखी एक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असल्याचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर बैठकीमध्ये या विषयावरून सत्तारूढ पक्षामध्येच वाद झाले होते.
याच कामासाठी याच स्थायी समितीने दीड महिन्यापूर्वी युनिटी कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला सल्लागार नियुक्त केल्याची माहिती आता पुढे आली आहे.
यापूर्वी जून २००७ मध्ये "आयएलएफएस' या संस्थेलाही याच कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.
शहरातील अनेक भागांना जानेवारीपासून टॅंकरची वाट पाहात बसावे लागते. पाणी दुसऱया मजल्याच्या वर पोहोचत नाही, अशी स्थिती तर दररोज असते. आता, तीन तीन सल्लागार नेमून तरी पाणी नीट मिळेल का? हा खरा कळीचा प्रश्न आहे...!
0 comments:
Post a Comment