व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

"इंद्रायणी' विशीची झाली!

पुणे-मुंबई एक्‍सप्रेसः सोमवारी वाढदिवस साजरा करणार

इंद्रायणी एक्‍सप्रेस एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. हजारो नोकरदारांची सोय व्हावी म्हणून सुरू केलेल्या "इंद्रायणी'चा विसावा वाढदिवस येत्या सोमवारी (ता. 28) तितक्‍याच दिमाखात तिचे लाडके प्रवासी साजरा करणार आहेत.

मुंबई-पुणे मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी "डेक्‍कन क्वीन' आणि "इंद्रायणी एक्‍सप्रेस' या गाड्या म्हणजे जीव की प्राण. गेल्या वर्षी "डेक्कन क्वीन'मधील खानपान सेवा बंदीचा निर्णय होताच उमटलेली तीव्र प्रतिक्रिया या सख्याचेच प्रतीक. "डेक्कन'इतकाच रुबाब "इंद्रायणी'चाही आहे. सोमवारी आयोजित केलेले कार्यक्रम तिच्याबरोबरच्या प्रवासाला उजाळा देणारे तर आहेतच; शिवाय अगदी वेगळेही आहेत.त्यासाठी "इंद्रायणी'च्या पाचशे-सहाशे प्रवाशांनी एकत्र येऊन जय्यत तयारी केली आहे.

पुणे स्टेशनच्या यार्डात सीझन तिकिटांच्या बोगीत सत्यनारायणाची पूजा होणार आहे. रेल्वे इंजिनाच्या आकारातील केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात येईल. शिवाय, पासधारक बोगीची सजावटही करणार आहेत. या प्रसंगी "इंद्रायणी'च्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणारे लोहमार्ग पोलिस अधिकारी आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान प्रवाशांतर्फे करण्यात येईल. "तसे पाहिले तर गेली आठ वर्षे आम्ही "इंद्रायणी'चा वाढदिवस साजरा करतो; पण, तिचा विसावा वाढदिवस आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. ही तयारी त्यासाठीच,' असे विकास घारे आणि यतिन तावडे या प्रवाशांनी सांगितले.

इंद्रायणीची जन्माकथा

"इंद्रायणी'ची जन्मकथा मोठी रंजक आहे. 1988 पूर्वी मुंबई-पुणेदरम्यान धावणारी एकही नवी रेल्वेगाडी नव्हती. त्या वेळी सुरू असलेली "पूना मेल' कोल्हापूरपर्यंत नेऊन "सह्याद्री एक्‍सप्रेस' म्हणून अस्तित्वात आणली. मुंबई- पुण्यातील औद्योगिक प्रगतीमुळे प्रवाशांची संख्या वाढली होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी "मध्य रेल्वे झोनल रेल्वे सल्लागार समिती'ने मुंबई- दौंड- मनमाड या कालबाह्य पॅसेंजर गाडीचे दोन भाग करण्याचा ठराव मंजूर केला. त्यातील मुंबई-पुणे जलद गाडी म्हणजे इंद्रायणी एक्‍सप्रेस. "इंद्रायणी' 1 मे 1988 पासून सुरू होणार होती; मात्र, प्रत्यक्षात 27 एप्रिल 1988 लाच अस्तित्वात आली. तेव्हाचे खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री शकंरराव चव्हाण यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

आपल्याकडे इंद्रायणीच्या आठवणी असतील, तर आम्हाला नक्की कळवा....

0 comments:

Post a Comment