व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार

बाणेर आणि कोथरूड परिसरात भिंत कोसळून ११ जणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा नाला आणि ओढ्यातील अतिक्रमणांचा विषय समोर आला. अशी अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी घोषणा महापालिका आयुक्तांनी केली. मात्र; "हा तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार' आहे.
महापालिकेच्या हद्दीतून सुमारे शंभरहून अधिक ओढे आणि नाले वाहतात. परंतु याची नोंद महापालिकेकडे नाही. याचा फायदा बांधकाम व्यावसायिक घेत आहेत. तर ज्या नाल्यांचा समावेश विकास आराखड्यात आहे, त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकाम व्यावसायिकांनी ते बुजविण्याचा धडका लावला. पावसाळा सुरू होऊन दोन दिवस होताच अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला. पावसाळा अजून चार महिने आहे. आणखी किती जणांचा जीव जाण्याची महापालिका वाट पाहणार ?

4 comments:

  1. Unknown said...
     

    I wish to draw attention to the following link

    http://sakaalblog.blogspot.com/2007/05/river-pollution-reader-writes.html

    The wrongs taking place do not escape attention of common man,but the powers that be including municipal bodies,even when knowing such things in detail,remain mum & if pointed out,feign ignorance.If they were alive to the situation,the present almost beyond redemption scenario about encroachments & reclamations in wrong sites would never have taken place nor some of the odhas & nullahs been filled up/blocked.
    महानगरपालिका इमारती पुर्ण झाल्यावर किंवा आधीच inspection न करताच [काही मोबदला टेबलाखालून घेवून?] भोगवटा पत्रे बिल्डरना बहाल करते.त्यामुळे निर्ढावलेले बिल्डर फ़क्त त्यांच्या फ़ायद्याकरता इमारतींच्या आसपास नाल्यांत वाटेल ते फ़रक करतात,भर घालतात,भिंती बांधतात व हे पावसाळा आल्यावर इतरत्र पाणी साचून हाहाकार झाल्यावर समजते लोकांना व पालिकेला!मग तात्पुरती मलमपट्टी जनतेच्या पैशाने सुरू!कोथरुडला मागच्या वर्षात या कारणाने लोकांना प्रचंड त्रास झाला होता!घोडा मैदान shows the consequences already!
    सुभाष भाटे

  2. Anonymous said...
     

    नमस्कार,

    वाकड उड्डाणपूल ते हिंजवडी माहिती तंत्रज्ञान वसाहत ह्या दरम्यानचा रस्ताही मनपा (बहुतेक पिंपरी चिंचवड मनपा) च्या बेफिकिरीचा उत्तम नमुना आहे. मागच्याच आठवड्यात त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले, ज्याची अजिबात गरज नव्हती (बहुतेक कोणा कंत्राटदाराची बिलं देण्याची मनपा च्या कर्मचा-यांना फार इच्छा असावी). ह्या रस्त्याचे डांबरीकरण करताना एकाच लेनमधे डांबराचा थर टाकला गेल्याने रस्ता असमान झाला आहे, ज्यामुळे नवीन डांबरीकरण केलेल्या आणि न केलेल्या भागाच्या कडेवर दुचाकी हमखास घसरते. एवढेच नव्हे तर रस्त्यावर सर्वत्र बारीक खडी पसरून ठेवली आहे त्यावरूनही गाडी चालवताना फार कसरत करावी लागते.

    ह्या असल्या कामाची चौकशी २-३ लोकांचा जीव गेल्यावर मग समिती नेमून करणार का?

  3. Anonymous said...
     

    Can somebody please tell me how can we write in Devnagari?

  4. Anonymous said...
     

    What happend in Baner will be soon repeated in Bavdhan if PMC does not take immediate action. A retaining wall may collaps and hence this time buildings are in danger. Because of the callousness and selfish attitude of people, many lives are in danger. Hills have been cut, soil and stones have vanished and course of rain water is either blocked or changed. Thus resulting in the vanishing of Ram nadi. There is no rule or law prevailing in Bavdhan. It is sad to see a IT savy city is growing so hap-hazrdly.

Post a Comment