व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सत्यम चा फुगा फुटला

देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.

वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्‍यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्‍यता आहे.

नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्‍वासार्हताही धोक्‍यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.

हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...