व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पुण्यातील वीजगळती न थांबल्यास कपात

महावितरण'चा इशारा ः ग्रामीण भागापेक्षाही जास्त गळती उघड

""पुण्यातील काही भागात ग्रामीण भागापेक्षाही जास्त वीजगळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही परिस्थिती तातडीने न सुधारल्यास त्या भागात वीजकपातीचा निर्णय घ्यावा लागेल,'' असा इशारा वीज महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजयभूषण पांडेय यांनी येथे दिला.

पुण्यातील वीज वितरणाचा आढावा बैठकीत घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पांडेय यांनी ही माहिती दिली.डॉ. पांडेय म्हणाले, ""विजेची गळती नियंत्रित करण्यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात साडेसात टक्के विजेची गळती कमी करून 29 टक्‍क्‍यांवर आणण्यात यश मिळविले आहे.

हे प्रमाण 2009 पर्यंत 18 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यात याचे प्रमाण अठरा टक्‍क्‍यांवरून 16 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. पुणे परिसरातील चिंचवड, आकुर्डी, आळंदी, नगर रस्ता या भागात वीजगळतीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वीज कंपनीतील प्रत्येक घटकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानंतरही वीजगळती सुरू राहिल्यास वीजकपातीचा निर्णय घ्यावा लागेल.''वीज भरण्याबद्दल महावितरण ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""वीजबिलाचे पाच हजार धनादेश प्रत्येक महिन्याला वटले जात नाहीत. यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधित ग्राहकाची वीज बंद करून त्याच्यावर खटला भरण्यात येईल.

''याबाबत आपल्याला काय वाटते?

1 comments:

  1. Unknown said...
     

    The admission by Dr.Pandeya that every month,5000 cheques of customers bounce is tantamount to his(read MSEDC)dereliction of duty.

    His threat of action against defaulters as well as imposing power cuts in areas, where electricity losses[MOSTLY due to continued POWER THEFTS & rest during transmission] are high, is unjustified because firstly the loss percentage is much lower in Pune than rest of maharashtra.

    Secondly,this matter should have been tackled long ago rather than setting belated targets.

    The power thieves have always been very much known to MSEDC,but since many of them are political big guns or have been bribing MSEDC staff regularly,this matter has got worsened.

    When the original MSEB act amended from time to time with enough teeth has always been available to the MSEDC,why has there been slackness & lack of ruthlessness in it's implementation?

    Very easy for Dr.Pandeya to pass the buck & threaten citizens with dire consequences of power cuts,when he is unable to pull up his socks!

    "chorala sodun sanyashala bali"

Post a Comment