व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

दुचाकीचालक, पादचाऱ्यांना सर्वाधिक अपघात

अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे शहरातील दुचाकीचालक आणि पादचारी यांच्यावर अपघाताची सतत टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण अपघातांपैकी 64 टक्के अपघात यांच्याशी निगडित आहेत.

पुणे परिसरात गेल्या सहा महिन्यांत अपघातात जखमी झालेल्या चार हजार 287 रुग्णांपैकी एक हजार 433 जण (33.4 टक्के) दुचाकीचालक होते, तर 542 जण (12.6 टक्के) दुचाकीवर मागे बसले होते. 789 पादचारीही (18.4 टक्के) वेगवेगळ्या अपघातांमध्ये जखमी झाले आहेत. एकूण अपघातग्रस्तांपैकी 64.4 टक्के यांच्याशी संबंधित आहेत. यावरून शहरातील दुचाकीचालक आणि पादचारी सर्वाधिक असुरक्षित असल्याचे स्पष्ट होते.

सर्वांत कमी अपघाताची नोंद रिक्षातील प्रवाशांची आहे. 97 प्रवाशांचा (2.4 टक्के) रिक्षातून प्रवास करताना अपघात झाला. बसमधून प्रवास करणाऱ्या 125 जणांचा (2.9 टक्के) आणि मोटारीतून प्रवास करणाऱ्या 127 जणांचा (2.9 टक्के) अपघात झाल्याची नोंद आहे. याआधारे सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक हे सर्वांत सुरक्षित साधन असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अपघातात एक हजार 788 जण (68 टक्के), अंतर्गत रस्त्यांवर 262 जण (10 टक्के) जखमी झाले. शहराला येणाऱ्या महामार्गांवर झालेल्या अपघातात 442 (16.8 टक्के) जण जखमी झाले. रस्त्यात पडलेल्या खडीवरून गाडी घसरून अपघात झाल्याने 827 जण (19.3 टक्के), तर वाहनाची धडक बसून 639 पादचारी (14.9 टक्के) जखमी झाले. यावरून रस्त्याची दुरवस्था स्पष्ट होते. गाडीला बाजूने धडक बसून 305 जण (7.1 टक्के) आणि मागून धडक बसून 329 जण (7.7 टक्के) जखमी झाले.

अरुंद रस्ते असल्याने अशा प्रकारच्या अपघातांची संख्या वाढते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


हेल्मेट, सीट बेल्ट...?
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एक हजार 975 अपघातग्रस्तांपैकी फक्त 149 जणांनी हेल्मेट घातले होते. त्यापैकी 39 जण हेल्मेट घालून गाडीवर मागे बसले होते. हेल्मेट न घातल्याने 610 जणांच्या डोक्‍याला मार लागला; तसेच मोटार अपघातात जखमी झालेल्या 201 पैकी अवघ्या 22 जणांनी (10.9 टक्के) "सीट बेल्ट' लावला होता.

पादचारी आणि दुचाकीचालक यांच्या अपघाताचे प्रमाण मोठे असले, तरी दोष कोणाला द्यायचा? पादचाऱ्यांना, दुचाकीचालकांना, अवजड वाहतूकदारांना, की रस्त्याच्या दुरवस्थेस कारणीभूत असलेल्या प्रशासनाला...?

1 comments:

  1. Unknown said...
     

    1] When the proverbial guinea pigs abound,it is easy to find not one,but many scapegoats too!
    In India,"the buck NEVER STOPS" at anyone really responsible for traffic control!
    2] With the latest news of our Govt deciding to allow on our highways/roads increased speeds of 100 Kms per hour from hithertofore 80 Kms,number of accidents are bound to increase further,coz quality of tyres has not improved,many thriving bars & pubs are doing brisk business along highways & in towns & rash as well as drunken driving has become the order of the day!
    The only future silver lining promised is of many 'accident clinics' being allowed to be set up as they are assured of 'good business' on our roads!
    3] Accidents are part of our 'Vikas' in sheer numbers & we must take them in our rapid strides!

Post a Comment