व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सर्वसाधारण सभेत पत्रकारांना "नो एंट्री'

जिल्हा परिषदेत काय कारभार चालतो, हे आता सर्वसामान्य नागरिकांना समजणार नाही! बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीतच हे ठरल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली आबणे यांनी दिली. पत्रकारांना प्रवेशबंदी करण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. हा मुद्दा लावून धरत विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत बसकण मारली. दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभा सुरू झाली. या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना दारातच अडविण्यात आले, तरीही ही सभा पत्रकारांना खुली असल्याकडे लक्ष वेधून पत्रकार आत गेले. दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा "पत्रकारांना सभागृहात बसण्यास मनाई केली आहे का,' असा प्रश्‍न विचारून खुलासा करण्याची मागणी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी केली. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी "पत्रकारांचा काय संबंध? ते सभागृहाचे सदस्य आहेत काय,' असे प्रश्‍न विचारले आणि पत्रकारांचा विषय महत्त्वाचा नसून प्रथम प्रश्‍नोत्तरे घ्यावीत, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला.

"पत्रकार हे सदस्य नसले, तरी ते या सभागृहातील विषय जनतेपर्यंत पोचवितात, त्यामुळे ते सभागृहात बसणे आवश्‍यक आहे,' असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. पत्रकारांना जागा नाहीप्रथम "पत्रकारांना बसण्यासाठी सभागृहात जागा नाही,' असे सांगण्यात आले, तेव्हा "आम्ही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करतो,' असे सांगत विरोधकांनी जागा सोडली आणि अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत बसकण मारली. मात्र, पत्रकारांना जागा नाही, असे सांगत असतानाच विविध पक्षांचे कार्यकर्ते मात्र सभागृहात मुक्तपणे वावरत असल्याचे आढळून येत होते.

अखेर "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत हे ठरले आहे,' असे अध्यक्षा वैशाली आबणे यांनी सांगितले. गेले काही दिवस जिल्हा परिषदेतील निधीचे वाटप, तीर्थक्षेत्र विकासाच्या फायलींचे प्रकरण अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे ही सर्वसाधारण सभा वादळी ठरणार, अशी शक्‍यता होती. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती.

सर्वसामान्यांच्या हितासाठी, तसेच विविध सुविधा योजना मंजूर करण्यासाठी सर्वसाधारण सभा घेतली जात असेल, तर पत्रकारांना बंदी घालण्यात असा कोणता स्वार्थ लपला असेल? वृत्तपत्र आणि पत्रकाराला समाजातील चौथा स्तंभ असे म्हटले जाते.

0 comments:

Post a Comment