व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

आपण सारेच अशिक्षित

आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेत असलो, तरी "वाहतुकी'बाबत अशिक्षितच आहोत, असे म्हणावे लागेल. सरकारनेही वाहतुकीचे शिक्षण देण्याबाबतचे कोणतेही धोरण निश्‍चित केलेले नाही. त्यातच कायदा पोलिसांनीच राबवावा, असा लोकांचा समज असल्याने, स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. दुसऱ्यांच्याच चुकांवर बोट ठेवण्याकडे कल असतो. मात्र, स्वतः किमान नियम पाळले, तर अपघात टाळणे शक्‍य आहे.
हे उपाय खालीलप्रमाणे :
* "नो एंट्री'तून जाताना अपघाताची शक्‍यता दुप्पट असते. समोरून येणारा वाहनचालक बेसावध आणि वेगात असल्याने जोरात धडक होऊ शकते. त्यामुळे "नो एंट्री'तून जाणे टाळावे.
* वळताना हात दाखवून, तसेच मागे पाहून वळावे.
* सिग्नल असताना सायकल हातात घेऊन चौक ओलांडला तरी चालते, असा समज आहे. मात्र, हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्‍यता असते.
* छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना, रहदारी बघावी. सर्व वाहने पास झाल्यावरच मुख्य रस्त्याला लागावे.
* आपली अथवा आपल्या ड्रायव्हरची झोप पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावी. रात्रीचा प्रवास शक्‍यतो टाळावा.
* रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त झाल्यास गाडीचे चारही "इंडिकेटर' चालू ठेवावेत.
* ट्रक व बसने डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जावे.
* पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनाच्या सर्व बाजूच्या व मागील वाहनांचा अंदाज घेणे अत्यावश्‍यक आहे. तसेच "ओव्हरटेक' केलेल्या वाहनाच्या 100 मीटर पुढे जाऊन, "इंडिकेटर' दाखवून मगच वाहन वळवावे.
* डावीकडील "लेन' ही ट्रक- बससाठी आहे. मधली "लेन' कार्ससाठी आणि उजवीकडची "लेन' ही केवळ "ओव्हरटेकिंग'साठी असते. त्यामुळे त्या लेनमधून गाडी चालवू नये. ती लेन रिकामी ठेवल्यास क्रेन अथवा रुग्णवाहिका अपघातग्रस्त वाहनापर्यंत तातडीने पोहोचू शकते.
* टोल नाक्‍यावर अथवा सिग्नलला थांबताना पुढील वाहनाचे "टायर्स' दिसतील, इतक्‍या अंतरावर थांबावे. कारण पुढील वाहन नादुरुस्त झाल्यास आपले वाहन डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवून काढता येते.
* द्रुतगती मार्गावर इतर वाहनांबरोबर शर्यत लावणे टाळावे. 100- 120च्या वेगाने जाणारे वाहन नियंत्रणात आणणे कठीण जाते. शिवाय अनवधानाने "स्टिअरिंग' वळल्यास गाडी घसरून अपघात होऊ शकतो..
* गाडीत "सिटबेल्ट्‌स' लावून बसणे महत्त्वाचे आहे. सर्वांत जास्त इजा कारमधून बाहेर फेकले गेल्याने होते.

केवळ वेगाने वाहन चालविता येणे म्हणजे चांगल्या चालकाचे लक्षण नाही. तर, वाहतुकीचे नियम सांभाळून आणि रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला योग्य तो मान देणे म्हणजे चांगला चालक. खालील प्रश्‍न स्वतःला विचारल्यास ते उत्तर मिळू शकेल...
* रस्त्यावरील इतर वाहनांचा कशाप्रकारे विचार करता? प्रतिस्पर्धी म्हणून?
* चौकात सिग्नल लागला असतानाही वाहन पुढे दामटता का?
* "झेब्रा क्रॉसिंग'च्या अलीकडे थांबता का?
* एखादे वाहन वळत असेल, तर तुम्ही थांबता का? की त्याच्या बाजूने सटकायला बघता?
* चौकात सिग्नल कार्यान्वित नसेल, अथवा पोलिस नसतील, तर आपल्या उजवीकडील रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाला प्राधान्य देतो का?
* वाहन चालविण्यापूर्वी मन:स्थिती तपासून पाहता का?

शासनाची भूमिका
अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर रुग्णालयात नेल्यास इजेची गंभीरता कमी होऊ शकते. हा फरक जगणे- मरणे या प्रकारातही असू शकतो. त्यातही अपघातग्रस्त व्यक्तीला पोलिस, पंचनामा या गोष्टींची वाट न पाहता इस्पितळात नेणे आवश्‍यक आहे. अपघातानंतरचा अर्धा तास "गोल्डन अवर्स' मानला जातो. या वेळेत रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पुढील दोन तासातही मिळत नाही. त्यामुळे अपघात कोठेही झाला, तरी अपघातग्रस्त व्यक्तीस ससूनऐवजी सर्व सुविधायुक्त जवळच्याच रुग्णालयात दाखल करावे, त्या रुग्णालयाचे "तातडी शुल्क' सरकारने भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यातून सरकारचा प्रत्येक परिसरात तातडीचे केंद्र सुरू करण्यावरील खर्चही वाचेल, रुग्णाचा जीवही...
..........
एक जानेवारी ते तीस मे दरम्यान दीडशे दिवसांत 165 घटनांत 170 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 159 गंभीर अपघात झाले असून, त्यात 178 जखमी झाले आहेत. 559 अपघातात 633 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गेल्या वर्षातील अपघात
360 अपघातांत 372 जणांचा मृत्यू
309 अपघातांत 338 गंभीर जखमी
1257 किरकोळ अपघातांत 1408 जखमी

6 comments:

  1. Anonymous said...
     

    Soochana oottam ach aahet !Karach lokanee vachoon sodoon na deta amalat aanalya tar ....... mag aanakhee kaay have !! Pan ....niyam palanare bavlat ashee sadhya paristhitee aahe ...tee badalanyacha pratyekane prayatna karayala hava ....
    Sulabah Bhide

  2. Unknown said...
     

    Well, I don't think the so called "educated" people: meaning people who are drivers of Indica, Autorickshaw, various types of private buses, PMT drivers, the descendents of "Chhatrapatis" and descendents of "Peshawas" (those that have inherent right to break traffic laws because they are descendents of "somebody"), the politicians, the traffic police, the "courageous-ones" who travel in opposite (on highways!), across and "into" the main traffic flow AND the "uneducated" poor senior citizens (who obey traffic rules) "ever" read this blog. So is there any use? Take my word guys. Keep a baseball bat with you, and... Well, haven't you ever played "RoadRash"?

  3. Anonymous said...
     

    hey neo, I have played roadrash. but dude, there is difference in computer roadrash and real life "roadrash". in real life roadrash you can not restart the game and you have only one life !!! so choice is yours !

  4. Anonymous said...
     

    Anonymous brother..

    These esteemed people (those that i mentioned earlier) are playing RoadRash with our lives everyday.. We have to have a community of "sane" citizens that has a "real" i.e. offline presence and then start applying "pressure".

  5. milind said...
     

    traffic system is gone out of control of everybody. there is very rare chance that we can modify roads in city area. we can't depend on pmt, and auto is out of question so by taking loans only people are managing on two wheelers, i think manaufacturers and loan companies are delibaretely see that there is no improvement in above condition so that they can mint money.

  6. उमेश said...
     

    We all are becoming Impatient. Thats it. Its not only about the Traffic but about the life also. We need everything in NO TIME. Life is there if you live it. About Traffic, lets be patient. Let us not be BLIND. We all are blind or need to be BLIND. No offence meant but its the fact. Evenif we see other vehicles are crossing the road we tend to push in between. If we are not standing on Zebra Crossing the vehicle behind would push us by honking and coming nearer to us. We need to do something, for sure. Initially just ensure that YELLOW BOARD vehicles have more responsibility being Commercial Ones. In case they break rules example :Bus, Trucks, Big Vehicles then small will do it, eventually. If they stop at a right time on a right place, others will not have any place to go further. Rules are meant to break is not true. Till the time we are breaking rules for our traffic and eventually it will happen in all areas of life. Write me back on umeshinamdar99@rediffmail.com

Post a Comment