व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अपघातांची कारणं कोणती?

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बाजारात आलेली वेगवान वाहने, मात्र रस्त्यांची स्थिती (अश्‍मयुगातील) "जैसे थे'... त्यामुळे सुशिक्षितांचे शहर आणि सुसंस्कृतीचा वारसा म्हणून मिरविणारे पुणे अपघातांबाबतही नावारूपास येऊ लागले आहे. शहराचा "अमिबा'प्रमाणे झालेला विस्तार, लोकसंख्या वाढ आणि तुलनेने रस्त्यांची अपुरी संख्या, अपघातांच्या वाढीस कारणीभूत ठरली आहे.

Picasa SlideshowPicasa Web AlbumsFullscreen


या सर्व बाबी नेहमीच चर्चिल्या गेल्या आहेत. वाहतुकीच्या बेशिस्तपणावरही टीका झाल्या आहेत. पण, ही बेशिस्तता नक्की कोणती, आणि ती शिस्तबद्ध कशी करता येईल, यावर मात्र क्वचितच विचार झाला आहे.
पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कार रेसर डॉ. राजेश मेहता यांनी पुण्यातील "वाहतूक' आणि "अपघात' या विषयावर विशेष अभ्यास केला आहे. शहरांतर्गत असणाऱ्या रस्त्यांवरील, महामार्गावरील अपघातांची कारणे वेगवेगळी असली, तरी दोन्हींचे परिणाम तेवढेच गंभीर असल्याचे त्यांचे मत आहे. हे अपघात टाळण्यासाठी पादचाऱ्यांपासून ते चारचाकीचालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, याचे विश्‍लेषण त्यांनी केले आहे.
अपघाताची कारणे :
बेदरकार "ड्रायव्हिंग' : तरुणांमध्ये हा प्रकार दिसतो. बरोबरील तसेच रस्त्यावरील इतर लोकांवर "इंप्रेशन' मारण्यासाठी वाहन भरधाव वेगाने चालविले जाते. परिणामी गाडीवरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्‍यता वाढते.
रात्रीचा प्रवास : एकूण अपघातांपैकी रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. यात वारंवार "ट्रिपा' मारणाऱ्या चार चाकी (सुमो, ट्रॅक्‍स) वाहनांचे अपघात अधिक असतात. बदलीकामगार ही पद्धत खासगी वाहतुकीत नसल्याने संबंधित "ड्रायव्हर'ने दिवसभरात एकापेक्षा अधिक "ट्रिपा' मारलेल्या असतात. त्यामुळे त्याने विश्रांती घेतलेली नसते. शिवाय रात्री आपले "व्हीजन'ही कमी झालेले असते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे डोळ्याला क्षणभर अंधारी येते. त्यातच समोरून अचानक आलेले वाहन दिसत नाही.
नादुरुस्त वाहन रस्त्यात लावल्यामुळे : अनेकदा वाहन नादुरुस्त झाल्याने ते रस्त्यातच आहे त्या स्थितीत उभे केले जाते. रात्री रस्त्यांवर दिवे नसल्यास वाहन थांबल्याचे लक्षात येत नाही. आपले वाहन त्यावर जाऊन धडकते. अथवा वाहन उजवीकडून वळविण्याच्या नादात समोरून येणारे वाहन धडकते. त्यामुळे बंद पडलेल्या वाहनावर "रेडियम'चे दोन त्रिकोण लावावेत. तसेच, गाडीच्या अलीकडे 50 ते 100 मीटर अंतरावर "रिफ्लेक्‍टर त्रिकोण' ठेवावा. तो चमकल्यानंतर 50 मीटर अंतरावर गाडी नियंत्रणात आणता येते.
ओव्हरटेक : महामार्गावर सर्रासपणे घडणाऱ्या अपघाताला "ओव्हरटेक' हे प्रमुख आहे. भरधाव वेगात येऊन पुढील वाहनाला उजवीकडून "ओव्हरटेक' करताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसण्याची शक्‍यता अधिक असते. डावीकडे वळण घेत असताना "ब्लाइंड' (ओव्हरटेक करत असताना मागील वाहनाला पुढचे काहीच न दिसणे, याला "ब्लाइंड' स्थिती म्हणतात) स्थितीतील अपघात होऊ शकतो.
दोन वाहनांमधील अयोग्य अंतर : रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याच दोन वाहनांमध्ये योग्य अंतर नसते. वास्तविक तुमच्या वाहन वेगाइतकेच अंतर तुमच्या व तुमच्यापुढील वाहनामध्ये असणे गरजेचे आहे. पुढचे वाहन अचानक थांबल्यास आपल्या वाहनांचा वेग नियंत्रणात येत नाही व अपघात होतो.
अधीरता : सिग्नल मिळण्याआधीच चौक ओलांडला जातो. अशावेळी सिग्नल असलेल्या बाजूकडून वेगात येणाऱ्या एखाद्या वाहनाबरोबर अपघात होऊ शकतो.
वाहतुकीतील अशिक्षितपणा : शहरातील वाहतूक माहिती नसलेला एखादा "ड्रायव्हर' छोट्या रस्त्यावरून त्याच वेगाने थेट महामार्गावर येतो. शिवाय पुढील 5- 10 फूट अंतरावरील वाहनांच्या मागे 80- 90 किलोमीटर वेगाने वाहन चालवितो.

पहिलीपासून "ट्रॅफिक'
इतर विषयांप्रमाणे "ट्रॅफिक' हा विषयदेखील अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्‍यक असून, थिअरीपेक्षाही प्रात्यक्षिकांवर भर देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शहरात एक "ट्रॅफिक पार्क' विकसित करावे. त्यामध्ये सिग्नल यंत्रणा, रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, चौक, वाहनतळ व चारचाकींच्या प्रतिकृती उभाराव्यात. कारमध्ये बसवून वाहतुकीचे नियम शिकवावेत.

3 comments:

  1. Anonymous said...
     

    Besides including 'Traffic' into curriculum, isn't it a high time to say a good bye to agents queuing outside the RTO office for doing 'License' related jobs?

  2. Anonymous said...
     

    exactly !! this is what we really need now. people get licence without giving exams. without learning the rules. kick out all those agents and make it mandatory for everyone to go through driving test as well as written test !

  3. Anonymous said...
     

    HI..

    Currently I am living in America & I have been thr in PUNE for 4 yrs.

    The Main problem with pune is its Infrastructure & Peoples.

    Though we can do anything regarding the roads in pune but the peoples can make big difference if they follow the Traffic rules sincerally.

    And also the Fine by Traffic Dept. is very less for disobeying the law. Thats why peoples are more prone to violate the traffic.

Post a Comment