व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

गढूळ पाणी येतंय...? तुरटी फिरवा !

"हल्ली आमच्याकडे नळ सुरू केला की पाण्याऐवजी चहाच येतो,'' ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी या परिसरातील नागरिकांची. या मागचे कारण आहे, ते या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून होणारा गढूळ पाणीपुरवठा. गढूळ पाण्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ तुरटी वापरून पाणी शुद्ध करण्याचा सल्ला नागरिकांना देऊन पुणे महापालिका बाजूला झाली आहे. महापालिकेतील गैरव्यवहार आणि अकार्यक्षमतेमुळेच या परिसरातील सुमारे चार लाखांहून अधिक नागरिकांना गढूळ पाणीच प्यावे लागत आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा वेळेत उभी राहू न शकल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. यापूर्वी या केंद्राच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महापालिकेने संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावली होती. त्याविरुद्ध त्याने न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली. त्यामध्ये काही महिने गेले. स्थगिती उठल्यानंतर हे काम प्रशासनाने दुसऱ्या कंत्राटदाराला दिले. मात्र, ते देताना स्थायी समितीचा आदेश धुडकावला. त्यामुळे त्या कंत्राटदाराचे बिल अदा केलेले नाही. बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा उभारण्याचे काम अर्धवट ठेवले. या सर्व गोष्टी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून केवळ मान्यता घेऊन काम सुरू करावयाचे आहे. ते करण्यासाठी प्रशासनाला "मुहूर्त' सापडत नाही. या परिसरातील नागरिकांना तुरटीचे वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही तुरटी क्षेत्रीय कार्यालय आणि संपर्क कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. आयटी, उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावणाऱ्या पुणे शहरातील नागरीकांना शुद्ध पाणी मिळत नसेल, तर केवळ तुरटीचे वाटप करून महापालिकेला हात झटकता येतील का...?

2 comments:

  1. Anonymous said...
     

    http://punepratibimb.blogspot.com/2007/06/blog-post_08.html#comment-2343431211779609248

  2. Anonymous said...
     

    Hi,

    I think for Pune & punekar this is the common trend. Whenever there will be problem, they themselves (I mean Punekar) resolves it and all the responsible people (like leaders, PMC officers) enjoy, eat and sleep peacefully.
    Same is happened here..the water is not healthy, then Punekar must get it cleaned by their own cost.
    This will never end unless someone punishes the responsible. I am waiting for that day.

Post a Comment