व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label river polution. Show all posts
Showing posts with label river polution. Show all posts

मुळा-मुठेच्या पाण्यात घातक द्रव्यांचे अंश

अभ्यासकांचा इशारा : पुढील पिढ्यांनाही परिणाम भोगावे लागतील
माणूस आणि जनावरांची प्रतिकारशक्ती निकामी करू शकणाऱ्या आणि कर्करोगासारख्या प्राणघातक रोगांना निमंत्रण ठरू शकणाऱ्या अत्यंत घातक द्रव्यांचे अंश मुळा-मुठेच्या पाण्यात आढळून आले आहेत. केवळ सध्याचीच पिढी नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही पाहणी करणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी)मधील "ऍनालिटीकल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ पॉलिमर अँड पेट्रोलियम इंजिनिअरिंग'मधील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुरेश कारखानीस यांनी हा अभ्यास केला आहे. शहर व पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या मुळा व मुठा नद्यांमधील पाण्याचे विविध ठिकाणचे नमुने गोळा करून त्याचे विश्‍लेषण केले आहे. या पाण्यात 16 ते 18 प्रकारची अशी द्रव्ये त्यांना आढळली. या दोन्ही नद्यांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असून, प्लॅस्टिकमधील अत्यंत घातक द्रव्ये या पाण्यात मिसळल्याचे त्यांना आढळून आले आहे.

यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होण्याची शक्‍यता असून, प्रतिकारशक्ती कमी होण्याचीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच "डीडीटी' "डीडीई' अशा बंदी घातलेल्या घातक पदार्थांचे अंशही आढळले आहेत. त्यावरून शहर व परिसरात या द्रव्यांचा बेकायदा वापर होत असल्याचेच स्पष्ट झाले आहे, असे डॉ. कारखानीस यांनी सांगितले. डिझेल आणि पेट्रोलमधील विषारी द्रव्यांचेही अंश दोन्ही नद्यांच्या पाण्यात आढळून आले आहेत. दरम्यान, अशा "ऑर्गेनिक' द्रव्यांचे अंश तपासण्यासाठी असा अभ्यास नियमित होण्याची गरज आहे, असे डॉ. कारखानीस म्हणाले. पुण्याबाहेर पाणी सोडताना त्यामध्ये असे अंश राहिले, तर पुढील गावांमध्ये हे पाणी पिणारे नागरिक आणि जनावरांसाठी; तसेच नदीतील माशांसाठीही घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुळा- मुठेचे सर्वेक्षण ही काही नवी बाब नाही. मात्र, होणाऱ्या प्रत्येक सर्वेक्षणातून नवीन धक्कादायक बाबी पुढे येत असतात. फार फार तर या सर्वेक्षणाच्या भल्या मोठाल्या बातम्या वृत्तपत्रातून छापून येतात. प्रत्यक्षात पुढे काय होते?? महापालिका यंत्रणा सुस्तच राहाते. नागरिकांनाही याचा काही फरक पडत नाही....आपल्याला काय वाटते??

मुळा-मुठा, गोदावरी सर्वाधिक प्रदूषित

देशातील नद्यांची जीवनवाहिनी ही ओळख आता झपाट्याने मागे पडते आहे... गंगा-यमुना-गोदावरी या नद्या आणि ब्रह्मपुत्रा किंवा नर्मदेसारख्या नद्यादेखील त्याला अपवाद नाहीत. ....

धार्मिक, विकासात्मक अशा विविध कारणांच्या आडून माणसाने नद्यांचा श्‍वास गुदमरून टाकल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे ताज्या राष्ट्रीय पाहणी अहवालावरून दिसून आले आहे. देशातील तब्बल 71 नदीपात्रं सर्वांत प्रदूषित असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 16 पात्रांचा समावेश आहे. यातही गोदावरी आणि मुळा-मुठा या नद्या सर्वांत प्रदूषित झाल्याचे हा अहवाल सांगतो. गोदावरी नदी तर महाराष्ट्र व आंध्र या दोन्ही राज्यांत भयानक प्रदूषित झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जपानचे अर्थसाह्य मिळाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील अनेक नद्यांबाबत मात्र, ज्या माणसांनी त्या दूषित केल्या, त्यांनाच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारीही त्वरित हाती घ्यावी लागणार आहे. असे न केल्यास पर्यावरणाला गंभीर धोका उद्‌भवू शकतो, असा स्पष्ट इशारा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. नदीपात्रांच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता.

गेली तीन वर्षे अभ्यास करून दिलेल्या या अहवालानुसार देशातील ज्या 71 पैकी 16 प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात आहेत. काठावरच्या किंवा अगदी पात्रातल्याही बांधकामांनी या नद्यांचा श्‍वास गुदमरतो आहे.