व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label flud. Show all posts
Showing posts with label flud. Show all posts

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पावसाळ्यासाठी सज्ज

मुख्य सचिव ः संभाव्य पूरग्रस्त गावांसाठी स्थानिक पथके तयार

पुणे विभागात प्रशासनाची मॉन्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असून पावसामुळे उद्‌भवणाऱ्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी नुकताच दिली.

पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील संभाव्य पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन तेथील प्रशासनाने केलेल्या पूर नियंत्रण आणि पुनर्वसन कामाबाबत जोसेफ यांनी समाधान व्यक्त केले. ""कोणत्याही परिस्थितीशी तोंड देण्यास प्रशासन सज्ज आहे,'' असे त्यांनी ठामपणे सांगितले. संभाव्य पूरग्रस्त गावांच्या संरक्षणासाठी जागेवरच तातडीने उपाययोजना करणारी स्थानिक पथके तयार असल्याचे सांगून ते म्हणाले, ""सरकारची मदत पोचण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याचे काम ही पथके करतील. पाचही जिल्ह्यांत अशी पथके विशेष प्रशिक्षणासह तयार आहेत. यासाठी पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे खास प्रशिक्षण देणारे केंद्र उभारण्यात आले आहे. येथून ही पथके निरोप येईल तेथे तातडीने पोचून उपाययोजना करतील. पूरग्रस्तांचे स्थलांतर, पुनर्वसन याबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी आणि अन्नधान्याच्या तरतुदीसाठीही ही पथके काम करणार आहेत.

त्यांच्या मदतीला यांत्रिक बोटी आणि होड्या असणार आहेत. याशिवाय अग्निशामक दलाचे जवानही त्यांना साह्य करणार आहेत.''""या विभागातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील नद्यानाल्यांमधील गाळ उपशाचे काम पूर्ण झाले आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी बंधारे घालण्यात आले आहेत. गटारे दुरुस्त करण्यात आली आहेत. या कामांमुळे यंदा कुठेही पूर परिस्थिती उद्‌भवणार नाही,'' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात इंद्रायणीच्या पात्रात होत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत ते म्हणाले, ""ज्यांना सरकारने परवानगी दिली आहे, तेवढीच बांधकामे सुरू आहेत. नदीपात्रातील अतिक्रमणांचे सर्वेक्षण केलेले नाही. फक्त संभाव्य पुरात धोकादायक म्हणून समावेश होत असलेल्या गावांचे सर्वेक्षण केले आहे. नदीपात्रातील काही बांधकामांवर कारवाई केली असता, संबंधितांनी मुख्यमंत्र्यांकडून कारवाईला स्थगिती मिळवली, अशी माझी माहिती आहे. ही स्थगिती उठविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू असून त्यानंतर लगेचच या बांधकामांवर कारवाई होईल. या संदर्भात नदीपात्राचे सर्वेक्षण करून स्वतंत्र आराखडाही तयार करण्यात येईल.''

अशाप्रकारचा दावा दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी केला जातो. मात्र, एका जोरदार पावसातच अव्यवस्थापन सुरू होते. मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस राहिले असतानाही शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी नुकताच खोदाईला सुरवात झाली आहे. ही कार्यक्रम असाच राहिला तर, पावसाळ्यात काय परिस्थिती उद्‌भवणार आहे, याची कल्पना न केलेलीच बरी... आपल्याला काय वाटत याविषयी?