व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label buisness. Show all posts
Showing posts with label buisness. Show all posts

टाटांना महाराष्ट्राचे आवताण - मुख्यमंत्री

नॅनो कारचा सिंगूर येथील प्रस्तावित प्रकल्प तेथून हटविण्याचा रतन टाटांनी विचार केल्यास त्यांनी महाराष्ट्रात यावे. त्यांचे लाल गालिचाने स्वागत करण्यात येईल; तसेच त्यांना जमीन व इतर सोयी सवलती दिल्या जातील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या जाहीर निवेदनात म्हणाले, ""टाटा उद्योग समूहाचा पाया महाराष्ट्रात आहे. त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस इथेच आहे. त्यामुळे त्यांनी नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रातच उभारावा, अशी राज्य शासनाची इच्छा आहे. पूर्वीसुद्धा हा प्रकल्प टाटांनी महाराष्ट्रातच उभारावा, असे राज्य शासनाला वाटत होते, पण रतन टाटांनी इतरत्र हा प्रकल्प उभारण्याचे कबूल केले होते. आता काही कारणास्तव हा प्रकल्प इतरत्र होत नसल्यास टाटा यांनी तो महाराष्ट्रात आणावा.

महाराष्ट्रातील चाकण परिसर देशाचा डेट्रॉईट म्हणून उदयास येत आहे; तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद हा परिसर देशातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना जमीन, पाणी देऊ. महाराष्ट्राने देशात औद्योगिक क्षेत्रात आपली आघाडी कायम ठेवली आहे. यामध्ये टाटा उद्योग समूहाचा मोठा हातभार लागला आहे. नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रात आला; तर महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील आघाडी आणखी बळकट होईल. राज्य शासनाच्या मेगा प्रोजेक्‍ट पॉलिसीनुसार (विशाल प्रकल्प धोरण) टाटांना सर्व सवलती दिल्या जातील. गरज भासल्यास मी स्वतः रतन टाटांची भेट घेईन.''

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे आपण स्वागत करताय का? आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा...