व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label traffice police. Show all posts
Showing posts with label traffice police. Show all posts

वाहतूक कोंडीवर उपाय ६८ चौकांत "रिमोट'द्वारे सिग्नलचे नियंत्रण

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर सुरळीत वाहतुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ६८ प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे नियमन "रिमोट कंट्रोल'द्वारे येत्या दहा दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

रिमोट कंट्रोलद्वारे वाहतूक दिव्यांचे नियमन करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. शहरात सुमारे २०० चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे आहे. त्यातील ६८ चौकांत तातडीने वरील योजना अमलात आणण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी महापालिकेकडे १२० रिमोटची मागणी केली असून ती तत्त्वतः मंजूर करण्यात आली आहे. शंभर मीटर अंतरापर्यंत रिमोटची कक्षा असेल. त्यामुळे चौकाच्या कोणत्याही भागातून वाहतूक पोलिस त्या दिव्यांचे नियमन करू शकतील. सध्या वाहतूक दिव्यांत ठराविक वेळेनुसार बदलाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ कमी करून अधिक वाहतूक असलेल्या रस्त्यासाठी वेळ वाढविता येत नाही, तसेच कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नियमन करण्यावर मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर रिमोट उपयुक्त ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील ३८ चौकांतील वाहतूक "एरिया ट्रॅफिक कमिटी'द्वारे नियंत्रित होतात. त्यात आणखी ३० नव्या चौकांची भर पडणार आहे. त्याशिवाय ४० नवे वाहतूक दिवे महापालिका उभारत आहे. "रिमोट'द्वारे नियमनाची मॉडर्न चौकात दोन दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी झाली, असेही त्यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे -
- शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल "सिंक्रोनाइझ' होणार
- पोलिसांवर हल्ला करणाऱ्याचा वाहन परवाना निलंबित होणार
- कागदपत्रे नसलेल्या ५०० रिक्षा अद्याप पोलिसांच्या ताब्यात
- चौकात वाहतुकीला अडथळा करणारे २७ बसथांबे हलविणार
- पाणी साचणाऱ्या ३१ ठिकाणी निचरा करण्याची मोहीम
- गोळीबार मैदान चौक ते हॉटेल अरोरा टॉवरपर्यंत एकेरी रस्त्याचा प्रस्ताव
- चारचाकी वाहनांचे पार्किंग शुल्क तीन तासांनंतर तासानुसार आकारण्याचा प्रस्ताव

या रिमोट कंट्रोल यंत्रणेचा काही फायदा होईल, असे वाटते का? बहुतांश चौकांमध्ये पोलिसांचा पत्ता नसतो. अशावेळी या रिमोटकंट्रोलचा वापर होण्याऐवजी ती डोकेदुखी वाटू लागेल. आपल्याला काय वाटते याविषयी?