आपण सारेच अशिक्षित
आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेत असलो, तरी "वाहतुकी'बाबत अशिक्षितच आहोत, असे म्हणावे लागेल. सरकारनेही वाहतुकीचे शिक्षण देण्याबाबतचे कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. त्यातच कायदा पोलिसांनीच राबवावा, असा लोकांचा समज असल्याने, स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. दुसऱ्यांच्याच चुकांवर बोट ठेवण्याकडे कल असतो. मात्र, स्वतः किमान नियम पाळले, तर अपघात टाळणे शक्य आहे.
हे उपाय खालीलप्रमाणे :
* "नो एंट्री'तून जाताना अपघाताची शक्यता दुप्पट असते. समोरून येणारा वाहनचालक बेसावध आणि वेगात असल्याने जोरात धडक होऊ शकते. त्यामुळे "नो एंट्री'तून जाणे टाळावे.
* वळताना हात दाखवून, तसेच मागे पाहून वळावे.
* सिग्नल असताना सायकल हातात घेऊन चौक ओलांडला तरी चालते, असा समज आहे. मात्र, हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्यता असते.
* छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना, रहदारी बघावी. सर्व वाहने पास झाल्यावरच मुख्य रस्त्याला लागावे.
* आपली अथवा आपल्या ड्रायव्हरची झोप पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावी. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा.
* रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त झाल्यास गाडीचे चारही "इंडिकेटर' चालू ठेवावेत.
* ट्रक व बसने डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जावे.
* पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनाच्या सर्व बाजूच्या व मागील वाहनांचा अंदाज घेणे अत्यावश्यक आहे. तसेच "ओव्हरटेक' केलेल्या वाहनाच्या 100 मीटर पुढे जाऊन, "इंडिकेटर' दाखवून मगच वाहन वळवावे.
* डावीकडील "लेन' ही ट्रक- बससाठी आहे. मधली "लेन' कार्ससाठी आणि उजवीकडची "लेन' ही केवळ "ओव्हरटेकिंग'साठी असते. त्यामुळे त्या लेनमधून गाडी चालवू नये. ती लेन रिकामी ठेवल्यास क्रेन अथवा रुग्णवाहिका अपघातग्रस्त वाहनापर्यंत तातडीने पोहोचू शकते.
* टोल नाक्यावर अथवा सिग्नलला थांबताना पुढील वाहनाचे "टायर्स' दिसतील, इतक्या अंतरावर थांबावे. कारण पुढील वाहन नादुरुस्त झाल्यास आपले वाहन डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवून काढता येते.
* द्रुतगती मार्गावर इतर वाहनांबरोबर शर्यत लावणे टाळावे. 100- 120च्या वेगाने जाणारे वाहन नियंत्रणात आणणे कठीण जाते. शिवाय अनवधानाने "स्टिअरिंग' वळल्यास गाडी घसरून अपघात होऊ शकतो..
* गाडीत "सिटबेल्ट्स' लावून बसणे महत्त्वाचे आहे. सर्वांत जास्त इजा कारमधून बाहेर फेकले गेल्याने होते.
केवळ वेगाने वाहन चालविता येणे म्हणजे चांगल्या चालकाचे लक्षण नाही. तर, वाहतुकीचे नियम सांभाळून आणि रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला योग्य तो मान देणे म्हणजे चांगला चालक. खालील प्रश्न स्वतःला विचारल्यास ते उत्तर मिळू शकेल...
* रस्त्यावरील इतर वाहनांचा कशाप्रकारे विचार करता? प्रतिस्पर्धी म्हणून?
* चौकात सिग्नल लागला असतानाही वाहन पुढे दामटता का?
* "झेब्रा क्रॉसिंग'च्या अलीकडे थांबता का?
* एखादे वाहन वळत असेल, तर तुम्ही थांबता का? की त्याच्या बाजूने सटकायला बघता?
* चौकात सिग्नल कार्यान्वित नसेल, अथवा पोलिस नसतील, तर आपल्या उजवीकडील रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाला प्राधान्य देतो का?
* वाहन चालविण्यापूर्वी मन:स्थिती तपासून पाहता का?
शासनाची भूमिका
अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर रुग्णालयात नेल्यास इजेची गंभीरता कमी होऊ शकते. हा फरक जगणे- मरणे या प्रकारातही असू शकतो. त्यातही अपघातग्रस्त व्यक्तीला पोलिस, पंचनामा या गोष्टींची वाट न पाहता इस्पितळात नेणे आवश्यक आहे. अपघातानंतरचा अर्धा तास "गोल्डन अवर्स' मानला जातो. या वेळेत रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पुढील दोन तासातही मिळत नाही. त्यामुळे अपघात कोठेही झाला, तरी अपघातग्रस्त व्यक्तीस ससूनऐवजी सर्व सुविधायुक्त जवळच्याच रुग्णालयात दाखल करावे, त्या रुग्णालयाचे "तातडी शुल्क' सरकारने भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यातून सरकारचा प्रत्येक परिसरात तातडीचे केंद्र सुरू करण्यावरील खर्चही वाचेल, रुग्णाचा जीवही...
..........
एक जानेवारी ते तीस मे दरम्यान दीडशे दिवसांत 165 घटनांत 170 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 159 गंभीर अपघात झाले असून, त्यात 178 जखमी झाले आहेत. 559 अपघातात 633 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गेल्या वर्षातील अपघात
360 अपघातांत 372 जणांचा मृत्यू
309 अपघातांत 338 गंभीर जखमी
1257 किरकोळ अपघातांत 1408 जखमी
हे उपाय खालीलप्रमाणे :
* "नो एंट्री'तून जाताना अपघाताची शक्यता दुप्पट असते. समोरून येणारा वाहनचालक बेसावध आणि वेगात असल्याने जोरात धडक होऊ शकते. त्यामुळे "नो एंट्री'तून जाणे टाळावे.
* वळताना हात दाखवून, तसेच मागे पाहून वळावे.
* सिग्नल असताना सायकल हातात घेऊन चौक ओलांडला तरी चालते, असा समज आहे. मात्र, हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्यता असते.
* छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना, रहदारी बघावी. सर्व वाहने पास झाल्यावरच मुख्य रस्त्याला लागावे.
* आपली अथवा आपल्या ड्रायव्हरची झोप पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावी. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा.
* रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त झाल्यास गाडीचे चारही "इंडिकेटर' चालू ठेवावेत.
* ट्रक व बसने डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जावे.
* पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनाच्या सर्व बाजूच्या व मागील वाहनांचा अंदाज घेणे अत्यावश्यक आहे. तसेच "ओव्हरटेक' केलेल्या वाहनाच्या 100 मीटर पुढे जाऊन, "इंडिकेटर' दाखवून मगच वाहन वळवावे.
* डावीकडील "लेन' ही ट्रक- बससाठी आहे. मधली "लेन' कार्ससाठी आणि उजवीकडची "लेन' ही केवळ "ओव्हरटेकिंग'साठी असते. त्यामुळे त्या लेनमधून गाडी चालवू नये. ती लेन रिकामी ठेवल्यास क्रेन अथवा रुग्णवाहिका अपघातग्रस्त वाहनापर्यंत तातडीने पोहोचू शकते.
* टोल नाक्यावर अथवा सिग्नलला थांबताना पुढील वाहनाचे "टायर्स' दिसतील, इतक्या अंतरावर थांबावे. कारण पुढील वाहन नादुरुस्त झाल्यास आपले वाहन डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवून काढता येते.
* द्रुतगती मार्गावर इतर वाहनांबरोबर शर्यत लावणे टाळावे. 100- 120च्या वेगाने जाणारे वाहन नियंत्रणात आणणे कठीण जाते. शिवाय अनवधानाने "स्टिअरिंग' वळल्यास गाडी घसरून अपघात होऊ शकतो..
* गाडीत "सिटबेल्ट्स' लावून बसणे महत्त्वाचे आहे. सर्वांत जास्त इजा कारमधून बाहेर फेकले गेल्याने होते.
केवळ वेगाने वाहन चालविता येणे म्हणजे चांगल्या चालकाचे लक्षण नाही. तर, वाहतुकीचे नियम सांभाळून आणि रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला योग्य तो मान देणे म्हणजे चांगला चालक. खालील प्रश्न स्वतःला विचारल्यास ते उत्तर मिळू शकेल...
* रस्त्यावरील इतर वाहनांचा कशाप्रकारे विचार करता? प्रतिस्पर्धी म्हणून?
* चौकात सिग्नल लागला असतानाही वाहन पुढे दामटता का?
* "झेब्रा क्रॉसिंग'च्या अलीकडे थांबता का?
* एखादे वाहन वळत असेल, तर तुम्ही थांबता का? की त्याच्या बाजूने सटकायला बघता?
* चौकात सिग्नल कार्यान्वित नसेल, अथवा पोलिस नसतील, तर आपल्या उजवीकडील रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाला प्राधान्य देतो का?
* वाहन चालविण्यापूर्वी मन:स्थिती तपासून पाहता का?
शासनाची भूमिका
अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर रुग्णालयात नेल्यास इजेची गंभीरता कमी होऊ शकते. हा फरक जगणे- मरणे या प्रकारातही असू शकतो. त्यातही अपघातग्रस्त व्यक्तीला पोलिस, पंचनामा या गोष्टींची वाट न पाहता इस्पितळात नेणे आवश्यक आहे. अपघातानंतरचा अर्धा तास "गोल्डन अवर्स' मानला जातो. या वेळेत रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पुढील दोन तासातही मिळत नाही. त्यामुळे अपघात कोठेही झाला, तरी अपघातग्रस्त व्यक्तीस ससूनऐवजी सर्व सुविधायुक्त जवळच्याच रुग्णालयात दाखल करावे, त्या रुग्णालयाचे "तातडी शुल्क' सरकारने भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यातून सरकारचा प्रत्येक परिसरात तातडीचे केंद्र सुरू करण्यावरील खर्चही वाचेल, रुग्णाचा जीवही...
..........
एक जानेवारी ते तीस मे दरम्यान दीडशे दिवसांत 165 घटनांत 170 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 159 गंभीर अपघात झाले असून, त्यात 178 जखमी झाले आहेत. 559 अपघातात 633 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गेल्या वर्षातील अपघात
360 अपघातांत 372 जणांचा मृत्यू
309 अपघातांत 338 गंभीर जखमी
1257 किरकोळ अपघातांत 1408 जखमी