पुण्याचे तापमान 40 पर्यंत पोचले आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होतो आहे. थोडी काळजी घेतली, तर हा उन्हाळा काही प्रमाणात तरी सुसह्य होईल.दररोज कमीतकमी 8 ते 12 ग्लास पाणी घ्यायला हवे.
सकाळी नाश्ता करण्यापूर्वी एक ग्लास लिंबूपाणी घ्यावे. यामुळे शरीराला नवा तजेला मिळतोच, पण त्याचबरोबर पित्ताशय व मूत्रपिंड यांची कार्यक्षमताही वाढते. त्यानंतरचा नाश्ताही हलकाच असावा.
कलिंगड, द्राक्षे, काकडी, अननस, केळी, लिंबू यांचे ज्यूस पिणे चांगले. हे रस गोड, थंड आणि पचायलाही हलके असतात.
रोजच्या आहारात दही, ताक, दूध यांचा समावेश असावा.
आंबट, तिखट आणि कोरडे अन्नपदार्थ खाऊ नका. त्याऐवजी लस्सी, दूध यांचा समावेश जेवणात करावा. काहीसे तूपही चालेल.
मांस खाणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी सोयाबीनचा वापर करावा. मासे अधिक उत्तम. यामध्ये अ, ब, ड व ई जीवनसत्त्व असते व शिजतातही लवकर.
कॉफी व मद्य यांचेही प्रमाण कमी करावे.
एसीमधून एकदम उन्हात जाऊ नका. थोडावेळ एसी नसलेल्या सावलीच्या ठिकाणी थांबा, म्हणजे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेऊ शकेल.
उन्हाळी कपडेकाळपट रंगांचे कपडे म्हणजे काळे, भडक रंगांचे कपडे वापरू नका. त्यामुळे शरीराचे तापमान वाढेल. दुसरी गोष्ट, या ऋतूमध्ये टेरिकॉट किंवा सिल्कचे कपडे वापरू नका. साधारण फिकट रंगाचे कॉटनचे कपडे (ज्यात पांढऱ्या रंगाचा जास्त वापर असेल) वापरणे अधिक चांगले.
मानसिक संतुलनया काळात मानसिक संतुलन स्थिर ठेवणे तितकेच गरजेचे असते. उकाड्यामुळे चिडचिड वाढलेली असते. त्यासाठी एक दिवसाआड तरी एखाद्या वनराईत किंवा पाणी असलेल्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला चांगला "ब्रेक' मिळेल.
शक्य तेवढे शांत झोपा. मनाला आनंद देईल असा दिवस घालवा. या दिवसात थंड पाण्याने अंघोळ केल्यास अधिक चांगले.
शिवाय फावल्या वेळात थंडगार पदार्थाची चव चाखण्यास काहीच हरकत नाही. फक्त आइस्क्रीम खाताना जरा जपून. खाताना हा प्रकार थंड लागत असला तरी बर्फ उष्ण आहे, हे विसरू नका.
लक्षात असू द्याअति खाण्यावर नियंत्रण ठेवा
जेवणात विविधता ठेवा
जडान्नापेक्षा पातळ आहार आणि पाणी अधिक चांगले
जेवणात किंवा सरबत-रसात जास्त मीठ वापरू नका
खाता खाताच पेय घेऊ नका.